नेता (३/३)
अशाप्रकारे, पहिला दिवस गेला आणि पुढचे काही दिवस सुद्धा असेच गेले. काही महत्त्वाचं असं घडलं नाही, फक्त लहान-सहान गोष्टीच: ते आधी सरळचालत एका खड्ड्यात पडले, त्यानंतर एका दरीमध्ये;ते ब्लॅकबेरीच्या झुडपांवर घासले गेले;त्यांच्या पायात बरेच काटे रूतले; बर्याच जणांचे हात आणि पाय तुटले; काही जणांच्या डोक्यावर मार लागला. पण या सर्व यातना सहन केल्या गेल्या. काही वृद्ध प्रवाशांना रस्त्यावर मृतावस्थेत सोडून देण्यात आलं.“ते जर घरी थांबले असते तरीसुद्धा मेलेच असते.प्रवासामध्ये आले आहेत म्हणून असं झालं असं नाहीय!“वक्ता बाकीच्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देण्यासाठीम्हणाला. काहीएक दोन वर्षांची लहान मुलं सुद्धा मरण पावली. पालकांनी त्यांच्या हृदयावर झालेलेहे घावमोठ्या कष्टाने सहन केले आणि हीच देवाची इच्छा आहे असं मानलं.“मुलं जितकी लहान, तितकं त्यांच्या मरणाचं दुःख कमी! जेव्हा ते अगदीच लहान असतात तेव्हा दुःख सर्वात कमी असतं. देवा, कोणत्या पालकांची मुलं लग्नाच्या वयात आल्यावर मरण नको पावू देत!जर मुलांच्या नशिबात मृत्यू असेल, तर तो आधीच आलेला बरा, त्यामुळे जास्त दुःखतरी होणार नाही!“ वक्त्यानेपुन्हा एकदा त्यांचं सांत्वन केलं. काहीजणांनी आपल्या डोक्याभोवती कपडे गुंडाळले होतेआणि आपल्या जखमांवर थंड पट्ट्या लावल्या होत्या.काहीजणांनीकपड्याचा पट्टा बनवून आपले हात गळ्याभोवती बांधून ठेवलेहोते. सगळ्यांचे कपडे फाटले आणि कापले गेले होते,चिंध्या होऊन लटकत होते, पण तरीही ते पुढे चालत राहिले. जर त्यांना सारखी भूक लागली नसती तर हे सगळं सहन करणं सोपं झालं असतं.
एका दिवशी काहीतरी वेगळंच घडलं.
नेता सर्वांच्या पुढे चालत होता, त्याच्याभोवती समूहामधील सर्वात शूर पुरुष होते.(त्यांपैकी दोघेजण उपस्थित नव्हते आणि ते कुठे गेले हेही कोणाला समजलं नाही. सर्वांनी असं गृहीत धरलं की ते हार मानून पळून गेले.एकदा वक्ताआपल्या भाषणात त्यांच्या विश्वासघाताबद्दल बोलला होता. पण फक्त काही जणांनाच असं वाटत होतं की ते दोघे प्रवासातच मृत पावले पण बाकीचे चिडतील म्हणून त्यांनी हे बोलून दाखवलं नाही.) बाकीचा समूह त्यांच्या मागून येत होता. अचानक त्यांच्यासमोर एक प्रचंड मोठी आणि खोल दरी आली. तिचा उतारच इतका तीव्र होता की पुढे एक पाऊल टाकणं सुद्धा शक्य नव्हतं. सर्वात हिंमतवान लोकसुद्धा थांबले आणि त्यांनी नेत्याकडे पाहिलं. कपाळावर आठ्या आणून विचारात गुंग झालेल्या आणिमान खालीच असलेल्या त्या नेत्याने धाडसानेएक पाय पुढे टाकला.आपल्या काठीने जमिनीवर त्याच्या नेहमीच्याच सवयीनुसार आधी उजवीकडे आणि मग डावीकडे टकटक केली. बऱ्याच जणांना त्याचं हे वागणं अजूनच विशेष आणि प्रतिष्ठेचंवाटायचं. त्याने कधीच कोणाकडे पाहिलं नव्हतं किंवा काही बोलला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील रेषा कधीही बदलल्या नव्हत्या आणि तो आता त्या दरीच्या जवळ जात असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीतीनव्हती.जवळ असलेले सर्वात हिंमतवान पुरुषही मृत्यूच्या भीतीने कापू लागले तरी कोणाचीही त्या ज्ञानी नेत्याला थांबवण्याची हिंमत झाली नाही. अजून दोन पावलं टाकून तो दरीच्या अगदी कडेला आला होता. जिवाच्या भीतीने ते सगळे हादरून गेले, पुढे असलेले पुरुष तर त्याला खेचायला तयारच होते,जरी त्यामुळे त्यांच्या नियमांचा भंग झाला असता तरी. त्या नेत्याने अजून एक पाऊल टाकलं आणि तो दरीमध्ये दिसेनासा झाला. सगळीकडे गोंधळ,आरडाओरडा सुरू झाला. सर्व लोकांमध्ये भीती पसरली. काहीजण पुन्हा मागे जाऊ लागले.
– थांबा,बंधुंनो! कसली घाई आहे?तुम्ही तुमचा शब्द असा पाळणार आहात का?आपणन घाबरता या ज्ञानी माणसाच्या मागे गेलं पाहिजे, कारण त्याला तो काय करतोय हे माहीत आहे.तो काही स्वतःला इजा करून घ्यायला वेडा नाही आहे.कदाचित ही दरी म्हणजेच सर्वात मोठा आणि शेवटचा अडथळा असेल. कुणास ठाऊक, कदाचित याच्या पलीकडेदेवाने आपल्यासाठी अतिशयउत्तम आणि सुपीक अशी जमीन ठेवली असेल. चला पुढे! त्याग केल्याशिवायसहज तरकाहीही मिळत नाही! – वक्ता हे शब्द म्हणाला, त्याने दोन पावलं पुढे टाकली आणि तोही दरीमध्ये दिसेनासा झाला.
बाकीचे हिंमतवान लोकही त्याच्या मागोमाग गेले आणि मग सगळेच खाली जाऊ लागले. त्या खडकाळ दरीमध्ये ओरडण्याचा, कळवण्याचा, रडण्याचा, आपटण्याचा,कण्हण्याचा आवाज घुमू लागला. त्या ठिकाणाहून कोणीही जिवंत बाहेर येऊ शकत नाही असंच वाटत होतं, मग काहीही इजा न होता अगदी व्यवस्थित बाहेर येणं तर अशक्य होतं. पण मानवी जीव खूप हट्टी असतो. नेता यावेळी अगदी विलक्षण पद्धतीने नशीबवान ठरला, तो पडत असतानाचत्याला झुडपांना पकडून ठेवता आलं, त्यामुळे त्याला काही इजा झाली नाही. त्याने स्वतःला वर खेचून बाहेर येण्यात यश मिळवलं. खाली जेव्हा कळवळण्याचा, ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज घुमत होता, तेव्हा तो बाहेरयेऊनआधीसारखाचशांतपणे विचार करत बसला.गंभीर जखमा झालेले बरेच जण खूप रागावले, आणि त्याला शिव्याशाप देऊ लागले. पण तो काहीच बोलला नाही. जे लोक झुडूपं किंवा झाडांना पकडण्यात यशस्वी झाले होते ते पुन्हा बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. काहीजणांची डोकीफुटली होती, त्यांच्या चेहर्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तिथेत्या नेत्याला सोडून कोणीचपूर्णपणे ठीक नव्हतं. वेदनेने कळवळत असतानाच,सर्वांची त्याच्याकडे पाहण्याची नजर बदलली. पण त्याने त्याची मान जराही वर केलीनाही,तोएखाद्या तपस्व्याप्रमाणे शांतचबसून राहिला.
काही काळ गेला आणि प्रवाशांची संख्या अजून कमी होत गेली. प्रत्येक दिवशी काहीतरी घडत होतं. काहीजण हा प्रवास सोडून पुन्हा मागे गेले.
सुरुवातीला असलेल्या प्रचंड संख्येमधून आता फक्त सुमारे वीस जण उरले होते. त्यांचे निस्तेज आणि मळलेले चेहरे भीती,आशंका,थकवा आणि भूक या सर्व भावना दर्शवत होते. पण कोणीही एक शब्दसुद्धा बोललं नाही.ते त्यांच्या नेत्याप्रमाणेच शांत राहिले आणि त्याच्या मागोमाग चालू लागले. आधी उत्साही असलेला वक्तासुद्धा आता नाराजीने मान हलवत होता. रस्ता अत्यंत कठीण होता.
त्यांची संख्या प्रत्येक दिवशी कमी होत गेली आणि शेवटी दहावर आली. नैराश्याने भरलेल्या चेहऱ्यांनी ते एकमेकांशी बोलताना फक्त तक्रारीच करत होते.
ते पूर्णपणे अपंग झाले होते. त्यांच्यापैकी काहीजण हातातकुबड्या घेऊन चालत होते. काहीजणांनी त्यांचे हात गळ्याभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये अडकवले होते. त्यांच्या हातांवर जागोजागी पट्ट्या बांधल्या होत्या.त्यांची अजूनत्रास सहन करण्याची तयारी असली तरी ते करू शकत नव्हते, कारण त्यांच्या शरीरावर आता जवळजवळ कुठेच नवीन जखमांसाठी जागा उरली नव्हती.
त्यांच्यापैकी सर्वात शूर आणि ताकदवानलोकांचासुद्धा आत्मविश्वास कमी झालाहोता. तरीही ते संघर्ष करत चालत होते, बरेच प्रयत्न करून,शिव्याशाप देत वेदनेने कळवळत मागून जात होते. अजून काय करू शकणार होतेते?इतकं सहन केल्यानंतर हा प्रवास सोडून परत मागे जाणं शक्य नव्हतं.
संध्याकाळ झाली!कुबड्या घेऊन लंगडत चालत असताना त्यांना अचानक दिसलं की नेता त्यांच्यासमोर नव्हता, अजून एक पाऊलपुढे, आणि ते सगळे पुन्हा एका दरीमध्ये घसरून पडले.
– ओह,माझा पाय! माझा हात! – कण्हण्याचा, रडण्याचा, ओरडण्याचा आवाजपुन्हा घुमू लागला.एका बारीकशाआवाजाने त्या ज्ञानी नेत्याला शिव्या दिल्या पण तो आवाजलगेच शांत झाला.
जेव्हा सूर्य वर आला, तेव्हा नेता समोरच बसला होता,अगदी तसाच जसातो त्यांना पहिल्या दिवशी दिसला होता. त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नव्हता.
तो वक्ता दरीतून बाहेर आला, त्याच्यामागोमाग अजून दोन जण आले.हातापायांना जखमा झालेले, रक्ताने माखलेले तेतीन प्रवासी मागे वळून अजून कितीजण उरले आहेत ते पाहू लागले,पण आता फक्त तेच राहिले होते.त्यांचं हृदयनैराश्याने आणि मृत्युच्या भीतीने पिळवटून गेलं. हा प्रदेश अनोळखी होता,खडकाळ,डोंगर-दर्या असलेला – इथे कुठेच वाट नव्हती. दोन दिवसांपूर्वी ते एका पायवाटेजवळ आले होते, पण त्यांनी ती वाट सोडून दिली. त्यांचा नेता त्यांना या रस्त्याने घेऊन आलाहोता. ते या प्रवासामध्ये मृत्यू पावलेल्या अनेक मित्रांचा आणि नातेवाईकांचा विचार करू लागले.वेदनेपेक्षा भयंकर असलेल्या दुःखाने त्यांच्यावर मात केली. त्यांना त्यांचा स्वतःचा विनाश स्वतःच्या डोळ्यांनी दिसला होता.
तो वक्ता नेत्याच्या जवळ गेला आणि थकलेल्याव वेदनेने थरथरणाऱ्या आवाजात बोलू लागला.
– आपण आता कुठे जात आहोत?
नेता शांतच होता.
– तुम्ही आम्हाला कुठे नेत आहात आणि तुम्ही आम्हाला कुठे आणलं आहे? आम्ही स्वतःला आणि आमच्या कुटुंबांना तुमच्या हातात सोपवलं होतं. आमची घरं आणि आमच्या पूर्वजांच्या आठवणींना मागेच सोडून तुमच्या सोबत आलो होतो, जेणेकरून आम्ही त्या नापिक जमिनीमध्ये मरून जाणार नाही. पण तुम्ही आमची अवस्था अजूनच दयनीय केली आहे. तुमच्या मागे दोनशे कुटुंबं होती आणि आता पहा किती जण उरले आहेत ते!
– म्हणजे सगळेजण इथे नाही आहेत?नेता मान वर न उचलता कुजबुजला.
-तुम्ही हा प्रश्न विचारू तरी कसा शकता?मान वर करा आणि पाहा!या दुर्दैवी प्रवासामध्ये आमच्यापैकी कितीजण उरले आहेत ते मोजा! आणि आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत हे पहा! अशाप्रकारे अपंग होण्यापेक्षा,आम्ही मारून गेलो असतो तर बरं झालं असतं.
– मी तुमच्याकडे पाहू शकत नाही!
– का नाही?
– मी आंधळा आहे.
एक दीर्घ शांतता.
– तुमची दृष्टीया प्रवासामध्ये गेली का?
– मी जन्मापासूनच आंधळा आहे!
तिघांनीही प्रचंड दुःखामध्ये आपलं डोकं पकडलं.
थंडगार वारा भयंकरपणे त्या खडकांतून वाहू लागला. त्याबरोबर काही सुकलेली पानं वाहत आली. टेकडीवर धुकंजमायला सुरुवात झाली आणि त्या थंड, धुरकट हवेतून गिधाडांचे पंख फिरू लागले.अगदी दुर्दैवी असाएकचीत्कार घुमला. सूर्य ढगांच्या पलीकडे लपला होता,जे वेगाने दूर आणि दूर निघून जात होते.
तिघांनीही एकमेकांकडे अतिशय भीतीने पाहिलं.
– आता आपण कुठे जायचं?– एकानेघाबरत विचारलं.
– माहीत नाही!
बेलग्रेड मध्ये, १९०१.
“रदोये डोमानोविच” प्रकल्पासाठी अनुवादक अभिषेक शेट्ये, २०२०.
नेता (२/३)
दुसर्या दिवशी, ज्यांच्यामध्ये दूरच्या प्रवासावर जाण्याचं धैर्य होतं असे लोक एकत्र आले. दोनशेहून अधिक कुटुंबं ठरवलेल्या ठिकाणी एकत्र जमली. फक्त मोजकेच जण जुन्या वसाहतीची देखभाल करण्यासाठी मागे थांबले.
या दुःखी लोकांच्या मोठ्या समूहाची अवस्था खूपच करुणाजनक होती. दुर्दैवाने त्यांना तो प्रदेश सोडून जावं लागत होतं जिथे ते लहानाचे मोठे झाले होते, जिथे त्यांच्या पूर्वजांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांचे चेहरे निस्तेज, थकलेले आणि उन्हाने रापलेले दिसत होते. कित्येक वर्षांच्या जीवतोड मेहनतीचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येत होता. त्यातून त्यांच्या दुःखाची आणि नैराश्याची कल्पना येत होती. पण याच क्षणी त्यांच्यात आशेचा एक किरणही दिसत होता – त्यात घराची आठवण सुद्धा होती. एका वृद्ध रहिवाशाच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळला आणि पुढे असलेल्या कठीण भविष्याच्या विचारानेच त्याने एक उसासा टाकला. त्याला चांगली जागा शोधण्यापेक्षा काही काळ इथेच राहून या दगडांमध्ये मरून जाणं चालणार होतं. बऱ्याच स्त्रिया शोकाकुल होऊन त्यांच्या मृत सोयऱ्यांच्या अंतिम स्थळाचा निरोप घेत होत्या.
पुरुष शूर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत होते आणि ओरडत होते, – तुम्हाला या शापित भागातील या झोपड्यांमध्ये राहून भुकेने मरून जायचं आहे का? – खरंतर त्यांना या दुर्दैवी भागातील आणि या गरीब झोपड्यांतील चांगल्या त्या सर्व गोष्टी आपल्या सोबत घेऊन जाणं आवडलं असतं, पण ते शक्य नव्हतं.
लोकांच्या समूहात असतो तसाच नेहमीचा गोंधळ इथे सुद्धा सुरूच होता. पुरुष आणि स्त्रिया दोघेही बेचैन होते. लहान मुलं त्यांच्या आयांच्या पाठीवरील पाळण्यांमध्ये केकाटत होती. त्यांचे प्राणी सुद्धा काहीसे अस्वस्थ होते. गुरं जास्त नव्हतीच, एखाददुसरं वासरू होतं. एक बारीकसा केसाळ घोडा होता ज्याचं डोकं मोठं आणि पाय जाडे होते. त्याच्यावर सर्वांनी जुन्या चादरी, पिशव्या आणि दोन गाठोडी टाकली होती. इतक्या वजनामुळे त्या प्राण्याचा तोल जात होता. तरीही तो ताठ उभा राहून वेळोवेळी खिंकाळत सुद्धा होता. बाकीच्यांनी गाढवांवर सामान लादलं होतं, मुलं कुत्र्यांना पकडून ठेवत होती. बोलणं, ओरडणं, शिव्या देणं, रडणं, भुंकणं, खिंकाळणं – सर्वकाही वाढत होतं. गाढव सुद्धा काहीवेळा ओरडलं. पण त्या नेत्याने एकही शब्द काढला नाही, जणू काही त्याचा या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता. खरंच एक ज्ञानी मनुष्य!
तो त्याचं डोकं खाली ठेवून शांतपणे विचारात मग्न होता. एक दोन वेळा बाजूला थुंकला, इतकंच. पण त्याच्या या विलक्षण वागण्यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली की सर्वजण फक्त त्याच्यासाठी अग्नी आणि पाण्यातून जायला तयार झाले असते. खालील संवाद तिथे ऐकू येत होते:
– असा माणूस आपल्याला भेटलाय याचा आनंद झाला पाहिजे. असं बोलू नये, पण जर त्याच्याशिवाय आपण निघालो असतो तर पुढे जाऊन मरून गेलो असतो. तो खरा बुद्धिमान आहे, मी सांगतोय ना! तो किती शांत आहे, अजून एक शब्दही बोलला नाहीय! – एक जण नेत्याकडे सन्मानाने आणि अभिमानाने पाहत म्हणाला.
– तो बोलेल तरी काय? जो कोणी जास्त बोलत राहतो तो खूप कमी विचार करतो. तो ज्ञानी आहे, हे तर नक्कीच निश्चित आहे! तो फक्त विचार करतो पण काही बोलत नाही, – दुसऱ्याने दुजोरा दिला, आणि तो ही नेत्याकडे आश्चर्याने पाहू लागला.
– इतक्या जास्त लोकांचं नेतृत्व करणं सोपं नाही आहे. त्याला सतत विचार करत राहावं लागतंय करण त्याच्या हातात मोठी जबाबदारी आहे, – पहिला पुन्हा म्हणाला.
निघण्याची वेळ झाली. ते थोडावेळ थांबून अजून कोणी त्यांच्यासोबत येत आहे का ते पाहू लागले, पण कोणी न आल्यामुळे थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता.
– आता निघालं पाहिजे ना? – त्यांनी नेत्याला विचारलं.
तो काहीही न बोलता उभा राहिला.सर्वात हिंमतवान पुरुष काही बरं-वाईट झालं तर त्याच्या जवळ असावं म्हणून लगेच त्याच्या भोवती जमले.
कपाळावर आठ्या आणि मान खाली असलेला तो नेता, आपली काठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तिप्रमाणे हलवत, काही पावलं पुढे गेला. सर्व लोकसुद्धा त्याच्या मागोमाग चालू लागले आणि ओरडू लागले, „आमच्या नेत्याचा विजय असो!“ तो अजून थोडा पुढे गेला आणि गावाच्या सभागृहासमोरील कुंपणावर जाऊन धकडला. तिथे अर्थातच तो थांबला, त्यामुळे बाकीचे लोक पण थांबले. नेता थोडासा मागे आला आणि आपली काठी काहीवेळ त्या कुंपणावर आपटू लागला.
– आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे?-लोकांनी विचारलं.
तो काहीच म्हणाला नाही.
– त्यांना काय विचारतोस? हे कुंपण तोडून टाकलं पाहिजे! हेच आता केलं पाहिजे! तू बघितलंस ना त्यांनी आपल्याला त्यांच्या काठीने सांगितलं काय करायचं ते? – नेत्याच्या जवळ उभे असलेले लोक म्हणाले. – पण प्रवेशद्वार तिथे आहे! – लहान मुलं ओरडू लागली आणि त्यांच्या विरुद्धदिशेला असलेलं प्रवेशद्वार दाखवू लागली.
– श्श! शांत रहा, मुलांनो.
– देवा, मदत कर, हे काय चाललंय? – काही स्त्रिया प्रार्थना करू लागल्या.
– काही बोलू नका. त्यांना माहितीय काय करायचं ते. हे कुंपण तोडून टाका.
क्षणार्धात ते कुंपण मोडून टाकण्यात आलं जसं काही ते तिथे नव्हतंच.
ते कुंपणाच्या पलीकडे आले.
ते जवळजवळ शंभर पावलं चालले असतील इतक्यात नेता एका काटेरी झुडुपावर आदळला आणि थांबला. मोठ्या प्रयत्नाने त्याने स्वतःला तिथून बाहेर काढलं आणि आपली काठी सर्व दिशांना जमिनीवर आपटू लागला. कोणीही हललं नाही.
– आता काय झालं आहे? – मागे असणारे ओरडू लागले.
– हे काटेरी झुडूप कापून टाका! – नेत्याच्या जवळ असणारे लोक म्हणाले.
– पण यावं झुडुपाच्या बाजूनेही वाट आहे! ती बघा तिथे! – लहान मुलं आणि मागे असलेले बरेच लोक सांगू लागले.
– तिथे वाट आहे! तिथे वाट आहे! – नेत्याच्या बाजूला असणारे रागाने वेडावून दाखवू लागले. – आपणच रस्ता सांगू लागलो त्यांना आपल्याला हवं तिथे कसं नेता येईल? प्रत्येकजण इथे आज्ञा देऊ शकत नाही. त्यांनाच सर्वात उत्तम आणि थेट रस्ता माहीत आहे. हे काटेरी झुडूप कापून टाका!
ते झुडुप काढून वाट तयार करण्यासाठी पुढे सरसावले.
– देवा, – एक जण ओरडला ज्याचा हात त्या काट्यांमध्ये अडकून गेला होता आणि अजून एक ज्याच्या चेहऱ्यावर त्या झुडुपाची फांदी लागली.
– बंधूंनो, मेहनत न करता काहीही मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी थोडे परिश्रम तर करावे लागतील. – समूहातील सर्वात हिंमतवान लोक म्हणाले.
बऱ्याच प्रयत्नांनी ते झुडुपातून बाहेर आले आणि पुढे निघाले.
अजून काही अंतर पुढे भटकत गेल्यावर त्यांच्यासमोर वाटेत काही लाकडी ओंडके आले. हे सुद्धा उचलून बाजूला टाकण्यात आले. मग ते पुढे गेले.
पहिल्याच दिवशी त्यांनी खूप कमी अंतर पार केलं होतं कारण त्यांना अशाच प्रकारचे अनेक अडथळे दूर करावे लागले होते. आणि त्यांच्याकडे अन्न सुद्धा खूप कमी होतं. कारण काहींनी फक्त सुके पाव आणि थोडं चीज आणलं होतं आणि काहींनी तर आपली भूक भागवण्यासाठी फक्त पाव आणले होते. काहींकडे काहीच नव्हतं. सुदैवाने उन्हाळा चालू होता म्हणून त्यांना मध्ये मध्ये काही फळांची झाडं मिळत होती.
म्हणून पहिल्याच दिवशी जरी त्यांनी खूप कमी अंतर पार केलं होतं तरी त्यांना खूप जास्त थकवा जाणवला. काही मोठे धोके आले नाहीत आणि अपघातही झाले नाहीत. इतक्या मोठ्या प्रवासामध्ये पुढील गोष्टी खूप सामान्य म्हणूनच गणल्या जातील: एका स्त्रीच्या डाव्या डोळ्यामध्ये काटा रुतला ज्यावर तिने ओला कपडा बांधून ठेवला; एक लहान मूल रडत असताना लाकडी ओंडक्यावर अडकून पडलं; एक वृद्ध मनुष्य ब्लॅकबेरीच्या झुडुपावरून घसरला आणि त्याचा पाय मुरगळला; त्यावर कांदा चोळल्यानंतर तो हिंमतीने वेदना सहन करत, आपल्या काठीचा आधार घेत, अभिमानाने नेत्याच्या पाठीमागून चालू लागला. (खरं सांगायचं तर, बरेच जण म्हणाले की तो वृद्ध मुरगळलेल्या पायाबद्दल खोटं बोलत होता, तो फक्त ढोंग करत होता जेणेकरून त्याला मागे जाता येईल.) काही काळाने, हातात काटे रुतले नाहीयत किंवा चेहरा घासला गेला नाहीय असे फार कमी लोक राहिले. पुरुष हे सर्व काही अभिमानाने सहन करत होते तर स्त्रिया त्यांच्या निघण्याच्या वेळेपासूनच शिव्याशाप देत होत्या. मुलं अर्थातच रडत होती कारण त्यांना या परिश्रमाचं पुढे जाऊन चांगलं फळ मिळणार आहे हे समजत नव्हतं.
पण सर्वांना याचा आनंद होता की नेत्याला काहीच झालं नव्हतं. खरं सांगायचं झालं तर, सगळेच त्याच्या रक्षणासाठी सावध होते, पण तरीही, तो स्वतः सुद्धा नशीबवान होता. पहिल्या रात्री थांबल्यावर सर्वांनी प्रार्थना केली व दिवसाचा प्रवास यशस्वी करून दिल्याबद्दल आणि नेत्याला काहीही इजा न पोहोचवल्याबद्दल देवाचे आभार मानले. नेत्याजवळच्या हिंमतवान पुरुषांपैकी एक जण बोलू लागला. त्याच्या चेहऱ्यावर ब्लॅकबेरीच्या झुडुपामुळे खरचटलं होतं पण त्याने त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.
– बंधूंनो, – त्याने सुरुवात केली.- देवाच्या कृपेमुळे आपण एका दिवसाचा प्रवास यशस्वीरित्या पार पाडला आहे. रस्ता सोपा नाही आहे, पण तरीही आपल्याला पुढे जावं लागेल कारण हा कठीण रस्ताच आपल्याला सुखाच्या दिशेने नेणार आहे. देव आपल्या नेत्याचं रक्षण करो जेणेकरून ते असंच यशस्वीपणे आपलं नेतृत्व करत राहतील.
– जर असंच सुरू राहिलं तर उद्या माझा दुसरा डोळा सुद्धा जाईल! – एक स्त्री काहीशा रागात म्हणाली.
– ओह, माझा पाय! – तो वृद्ध पुरुष म्हणाला, ज्याला त्या स्त्रीच्या बोलण्याने उत्तेजन मिळालं.
लहान मुलं रडत होती, आणि त्यांच्या आया भाषण चालू असल्याने त्यांना शांत बसवत होत्या.
– होय, तुझा दुसरा डोळा सुद्धा जाईल, – वक्ता रागाने भडकून म्हणाला,- आणि जाऊ देत तुझे दोन्ही डोळे! अशा महान कार्यासाठी एखाद्या स्त्रीचे डोळे गेले तर काही नाही होणार. जरा विचार करा! तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य पाहिलं पाहिजे. आपल्यातले अर्धे जण या प्रवासात मेले तरी चालतील! काही फरक पडणार नाही! एका डोळ्याचं काय घेऊन बसलात? आपली काळजी घेणारं आणि आपल्याला सौख्याच्या दिशेने नेणारं कोणीतरी इथे असताना डोळे हवेतच कशाला?आपण काय फक्त तुझ्या एका डोळ्यासाठी आणि या म्हाताऱ्याच्या पायासाठी आपलं ध्येय विसरून जायचं?
– तो खोटं बोलतोय! तो म्हातारा खोटं बोलतोय! त्याला परत मागे जायचं आहे म्हणून तो ढोंग करतोय. – चहुबाजूंनी आवाज येऊ लागले.
– बंधूंनो, ज्या कोणाला पुढे जाण्याची इच्छा नसेल, – वक्ता पुन्हा बोलू लागला, – तो तक्रार करत बसण्यापेक्षा परत जाऊ शकतो. माझ्याबद्दल विचाराल तर, मी या ज्ञानी नेत्याच्या मागून तोपर्यंत जात राहीन जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण उरले आहेत!
– आम्हीही जाऊ! आम्हीही जिवंत आहोत तोवर त्यांच्या मागे जाऊ!
तो नेता शांतच होता.
प्रत्येक जण त्याच्याकडे पाहून कुजबुजू लागला:
– तो विचारांत मग्न झाला आहे!
– ज्ञानी मनुष्य!
– त्याच्या कपाळाकडे पाहा!
– सतत आठ्या पडलेल्या असतात!
– खूप गंभीर!
– तो शूर आहे! त्याच्याकडे बघूनच समजतं.
– बरोबर बोलतोयस तू! कुंपणं, ओंडके, झुडूपं – तो सगळ्यातून मार्ग काढतो. तो फक्त शांतपणे त्याची काठी आपटतो, काहीही न बोलता, आणि आपल्याला समजून घ्यावं लागतं तो काय विचार करत असेल.
नेता (१/३)
– बंधूंनो आणि मित्रांनो, मी तुम्हा सर्वांची भाषणं ऐकली आहेत, आणि तुम्ही आता माझं ऐकावं अशी मी विनंती करतो. जोवर आपण या ओसाड प्रदेशातच राहत आहोत तोवर आपल्या या सर्व चर्चा आणि वादविवाद व्यर्थ आहेत. या रेताड जमिनीमध्ये आणि या खडकांमध्ये जेव्हा पाऊस होता त्यावेळीही काही पिकू शकलं नाही, तर आताच्या, सर्वात तीव्र असलेल्या या दुष्काळात इथे काहीही पिकणं अगदीच अशक्य आहे. आपण किती वेळ असे एकत्र येऊन आपली रडगाणी गाणार आहोत? गुरं अन्नाशिवाय मरत आहेत, आणि लवकरच आपल्याला आणि आपल्या मुलांनाही खायला मिळणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा उपाय शोधला पाहिजे जो उत्तम आणि अमलात आणण्याजोगा असेल. मला वाटतं आपण ही उजाड जमीन सोडून बाहेरच्या जगात गेलं पाहिजे जिथे चांगली आणिसुपीक माती असेल, कारण अशा अवस्थेत तर आपण फार काळ जगू शकणार नाही.
अशाप्रकारे एका ओसाड भागातला एक रहिवासी एका सभेमध्ये अगदी थकलेल्या आवाजात बोलला होता. कधी आणि कुठे हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा की असं कुठल्यातरी प्रदेशात फार काळापूर्वी घडलं होतं, आणि तेच महत्त्वाचं आहे. खरंसांगायचं तर, एकदा मला वाटू लागलं की ही गोष्ट मीच तर तयार केलेली नाही ना, पण हळूहळू मी स्वतःला त्या विचित्र विचारातून मुक्त केलं. आता माझा ठाम विश्वास आहे की मी या कधीतरी कुठेतरी प्रत्यक्षात होऊन गेलेल्या घटनेचा इथे संदर्भ देऊ शकतो जी मी अजिबात माझ्या कल्पनेतून तयार केलेली नाही.
आपले हात खाली ठेवून, खिन्न, गोंधळलेल्या नजरेने पाहत,उदास व निस्तेज चेहर्याने समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहर्यावर या विद्वत्तापूर्ण शब्दांमुळे थोडी तरतरी दिसू लागली. सगळेजण लगेच कल्पनेत हरवून गेले की ते एका जादुई, स्वर्गीय प्रदेशामध्ये आहेत जिथे जीवतोड मेहनतीचं फळ म्हणून खूप जास्त पीक मिळत आहे.
– बरोबर आहे! बरोबर आहे! – सर्व बाजूंनी थकलेल्या आवाजात कुजबूज सुरू झाली.
– ही जागा कुठे जवळ आहे का? – एका कोपर्यातून हळूच आवाजात प्रश्न विचारला गेला.
–बंधूंनो! – अजून एकजण काहीशा खणखणीत आवाजात बोलू लागला. – आपण लगेचच हा सल्ला अंमलात आणला पाहिजे कारण आपण असे फार काळ जगू शकणार नाही. आपण खूप परिश्रम करून स्वतःला त्रास करून घेतला, तरीही काही फायदा झाला नाही. आपण पेरणी केली ज्यातून आपल्याला काहीतरी खायला मिळू शकलं असतं पण पूर आला आणि मातीसकट सर्वकाही वाहून घेऊन गेला, ज्यामुळे आता फक्त हे खडक उरले आहेत. आपण सकाळ संध्याकाळ परिश्रम करूनही तहानलेले आणि भुकेलेलेच आहोत, विवस्त्र आणि अनवाणीच आहोत. तरीही आपण इथेच राहायचं का? आपल्याला इथून बाहेर पडून चांगली सुपीक जमीन शोधली पाहिजे जिथे आपल्या परिश्रमांचं फळ म्हणून आपल्याला भरभरून पीक मिळेल.
– चला! लवकर चला! कारण ही जागा आता राहण्यालायक राहिली नाही आहे.
कुजबूज वाढू लागली, आणि प्रत्येकजण चालू लागला,आपण कुठे जातोय हे न पाहताच.
– थांबा, बंधूंनो! कुठे जाताय तुम्ही?– पहिला वक्ता पुन्हा बोलू लागला. – हो, बाहेर जायचंच आहे, पण असं जायचं नाहीय. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण कुठे जातोय. नाहीतर आपण यापेक्षाही कठीण परिस्थितीमध्ये अडकू. मला वाटतं आपण एक नेता निवडला पाहिजे, ज्याचं सर्वांना ऐकावं लागेल आणि जो आपल्याला सर्वात उत्तम आणि अचूक मार्ग दाखवू शकेल.
– हो, निवडा! लगेच कोणालातरी निवडा! – चहूबाजूंनी आवाज येऊ लागला.
पण यावेळी आवाज वाढू लागला, गोंधळ झाला. प्रत्येकजण बोलत होता आणि कोणीच ऐकत किंवा ऐकू शकत नव्हतं. ते वेगवेगळ्या गटांत विभाजित होऊ लागले, प्रत्येकजण स्वतःशीच बोलत होता आणि नंतर हे गटसुद्धा विभागले गेले. आता दोघादोघांच्या जोड्यांमधून लोक बोलू लागले, आपलं म्हणणं पटवून देऊ लागले, एकमेकांच्या हातांना धरून खेचू लागले, आणि आपल्या हातांनी दुसर्यांना शांत राहण्याच्या खुणा करू लागले. सर्वजण एकत्र आले, अजूनही बोलत.
– बंधूंनो! – अचानक एक खणखणीत आवाज घुमला, ज्यामुळे बाकीचे कुजबुजणारे, निस्तेज आवाज विरून गेले. – आपल्याला अशाप्रकारे काहीच ठरवता येणार नाही. प्रत्येकजण बोलतो आहे आणि कोणीच ऐकत नाहीय. आपल्याला एक नेता निवडायचा आहे. आपल्यातून आपण कोणाला निवडू शकतो? आपल्यातल्या कोणी इतका प्रवास केला आहे ज्याला रस्ते माहीत असतील? आपण सगळे एकमेकांना चांगले ओळखतो, पण तरीही मी स्वतःला आणि माझ्या मुलांना इथल्या कोणाच्याही नेतृत्वाखाली ठेवू शकत नाही. त्यापेक्षा, मला सांगा आज सकाळपासून त्या रस्त्याच्या कडेला सावलीत बसलेल्या त्या प्रवाशाला कोण ओळखतं?
शांतता पसरली. सगळे त्या अनोळखी व्यक्तीकडे वळले आणि त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळू लागले. मध्यमवयीन, खिन्न चेहरा, जो वाढलेल्या केस आणि दाढीमुळे नीट दिसतही नव्हता असा तो प्रवासी तसाच शांत बसून राहिला, विचारात हरवून जाऊन मध्येच आपली मोठी काठी जमिनीवर आपटत होता.
– काल मी त्याच माणसाला एका लहान मुलाबरोबर पाहिलं होतं. त्यांनी एकमेकांचा हात पकडला होता आणि रस्त्यावरून चालत जात होते. आणि काल रात्री तो मुलगा गाव सोडून गेला पण हा माणूस इथेच थांबला.
– बंधू, या क्षुल्लक गोष्टींवर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीय. तो जो कोणी असेल तो फार दूरवरून इथे आला आहे कारण आपण कोणीच त्याला आधी पाहिलं नाहीय. आणि त्याला इथून जाण्याचा सर्वात अचूक रस्ता नक्कीच माहीत असेल. मला असं जाणवतंय की तो खूप ज्ञानी मनुष्य आहे कारण तो शांतपणे तिथे बसून विचार करतो आहे. दुसरं कोणी असतं तर इतक्यात दहा वेळा त्याने आपल्या बोलण्यात व्यत्यय आणला असता किंवा इतक्यात आपल्यातल्या कोणा एकाशी बोलूसुद्धा लागला असता. पण तो बराच वेळ तिथे एकटाच बसून आहे आणि काहीच बोलत नाहीय.
– तो शांतपणे बसला आहे म्हणजे अर्थातचतोगहन विचार करतो आहे. तो नक्कीच एक ज्ञानी मनुष्य असला पाहिजे. – बाकीच्यांनी दुजोरा दिला आणि पुन्हा त्या माणसाचं निरीक्षण करू लागले. प्रत्येकाला त्याच्यामध्ये तो खूप बुद्धिमान असल्याची खात्री करून देणारा काहीतरी वेगळा गुण दिसत होता.
बोलण्यात अजून जास्त वेळ घालवायचा नव्हता, म्हणून शेवटी सर्वांनी ठरवलं की या प्रवाशालाच जाऊन विचारावं, ज्याला देवाने त्यांना नवी सुपीक जमीन शोधण्यात मदत व्हावी म्हणून पाठवलं आहे असं त्यांना वाटत होतं. तोच त्यांचा नेता बनला पाहिजे आणि ते काहीही प्रश्न न विचारता म्हणणं ऐकतील.
त्यांनी त्यांच्यातल्या दहा जणांना निवडलं जे त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्यांचा निर्णय सांगणार होते. त्याला त्यांच्यावर आलेल्या दयनीय परिस्थितीची माहिती करून देणार होते आणि त्यांचा नेताबनण्याची विनंती करणार होते.
म्हणून दहा जण पुढे गेले आणि त्याच्यासमोर नम्रतापूर्वक झुकले. त्यांच्यातला एकजण तिथली नापीक जमीन, दुष्काळी वर्षं आणि त्यांच्या करूणाजनक परिस्थितीबद्दल बोलू लागला. त्याने त्याचं बोलणं असं पूर्ण केलं:
– या परिस्थितीमुळे आम्हाला आमचं घर आणि आमची जमीन सोडून बाहेरच्या जगात चांगल्या जमिनीच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. यावेळी जेव्हा आम्ही एका निर्णयापर्यंत पोहोचलो तेव्हा देवानेच आमच्यावर कृपा केली असं दिसतंय. कारण त्याने तुम्हाला पाठवलंय. एका ज्ञानी आणि बुद्धिमान मनुष्याला. जो आमचं नेतृत्व करून आमची या संकटातून सुटका करेल. इथल्या सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही तुम्हाला आमचा नेता बनण्याची विनंती करतो. तुम्ही जिथेही जाल, आम्ही सोबत येऊ. तुम्हाला रस्ते माहीत आहेत, आणि नक्कीच एखाद्या चांगल्या प्रदेशात तुमचा जन्म झाला असेल. आम्ही तुमचं नीट ऐकू आणि तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू. तर हे ज्ञानी मनुष्या, तुम्ही इतक्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार आहात का? तुम्ही आमचा नेता बनाल का?
या विनंतीपूर्ण भाषणामध्ये त्या ज्ञानी माणसाने एकदाही त्याचं डोकं वर उचललं नाही. संपूर्ण वेळ तो तसाच बसला होता जसं त्यांनी त्याला पाहिलं होतं. त्याचं डोकं खाली झुकलं होतं, कपाळावर आठ्या होत्या, आणि तो काहीच बोलला नाही. तो फक्त वेळोवेळी त्याची काठी जमिनीवर आपटत विचार करत होता. जेव्हा हे भाषण संपलं तेव्हा तो जराही न हलता तुटकपणे म्हणाला:
– हो.
– मग आम्ही तुमच्यासोबत येऊन नवीन जागा शोधू शकतो का?
– हो. – मान वर न करता त्याने उत्तर दिलं.
सर्वांमध्ये उत्साह पसरला सगळे त्याचे आभार मानू लागले, पण तो मनुष्य त्यांच्याशी काहीही बोलला नाही.
ते दहा जण परत येऊन सर्वांना ही चांगली बातमी सांगू लागले आणि म्हणाले की आताच त्यांना या मनुष्याच्या महान बुद्धिमत्तेचा साक्षात्कार झाला.
– तो त्याच्या जागेवरून हलला सुद्धा नाही किंवा आपण कोणाशी बोलतोय हेही त्याने पाहिलं नाही. तो शांत बसून विचारच करत राहिला. आम्ही इतकं बोललो आणि त्याचं कौतुक केलं पण तो फक्त दोन शब्दच बोलला.
– महान मनुष्य! विलक्षण बुद्धिमत्ता! – सर्वजण आनंदाने ओरडू लागले आणि म्हणू लागले की प्रत्यक्ष देवानेच त्यांना वाचवण्यासाठी या महान मनुष्याला स्वर्गातून या प्रदेशात पाठवलं आहे. सर्वांना खात्री झाली की जगातील कोणत्याही गोष्टीमुळे मानसिक शांती भंग होऊ न देणार्या अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली त्यांना नक्कीच यश मिळेल. आणि त्यांनी दुसर्याच दिवशी पहाटे त्या प्रदेशातून निघण्याचा निर्णय घेतला.
ठसा
मला एक भयंकर स्वप्न पडलं. मला स्वप्नाबद्दल इतकं काही वाटत नाहीय, पण आश्चर्य याचं वाटतंय की माझी इतक्या भयंकर गोष्टींची स्वप्नं पाहण्याची हिंमत तरी कशी होते, कारण मी स्वतः एक शांत आणि प्रतिष्ठित नागरिक आहे,इतरांप्रमाणेच आपल्या प्रेमळ सर्बिया मातेचा आज्ञाधारक मुलगा आहे. अर्थातच यामुळे जर मी काही अपवादात्मक गोष्ट करत असेन तर ती फारच वेगळी असेल, पण नाही, मी तर अगदी बाकीच्यांप्रमाणेच वागतो आणि जर आपण काळजीपूर्वक वागण्याबद्दल बोलत असू तर तिथे माझी कोणीच बरोबरी करू शकत नाही. एकदा मला रस्त्यामध्ये एका पोलीसाच्या वर्दीवरील चमकदार बिल्ला पडलेला दिसला, आणि मी जवळून जात असतानाच त्याच्या जादुई तेजाकडे पाहिलं, बर्याच सुंदर आठवणी जाग्या झाल्या आणि अचानक माझा हात थरथरू लागला त्याला सलामी देण्यासाठी वर आला; माझी मान नकळतपणे खाली झुकली, आणि माझ्या चेहर्यावर ते सुंदर हास्य आलं जे आपण ज्येष्ठ व्यक्तींना अभिवादन करताना वापरतो.
– माझ्या रक्तातच सभ्यता भरली आहे – नक्कीच असंच आहे! – मी असा विचार करत होतो तेव्हाच एका क्रूर माणसाने त्या बिल्ल्यावर निष्काळजीपणे पाय दिला आणि मी त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं.
– मूर्ख! – मी रागात बोलून थुंकलो, आणि शांतपणे पुढे गेलो. असे मूर्ख लोक कमी आहेत अशी स्वतःचीच समजूत घातली, आणि देवाचे मला इतकं सुसंस्कृत हृदय आणि माझ्या पूर्वजांचं सभ्य व उमदं रक्त दिल्याबद्दल आभार मानले.
हं, तर तुम्हाला समजलंच असेल मी किती चांगला मनुष्य आहे ते, इतर प्रतिष्ठित नागरिकांसारखाच, आणि आता तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की अशा भयंकर आणि हास्यास्पद गोष्टी माझ्या स्वप्नात कशा काय येऊ शकतात.
त्यादिवशी वेगळं असं काहीच घडलं नव्हतं. मी छानपैकी जेवलो आणि नंतर वाइन पित,आरामात माझे दात कोरत बसलो. माझ्या नागरी हक्कांचा असा धैर्याने आणि विचारपूर्वक उपयोग केल्यानंतर मी झोपायला गेलो आणि लवकर झोप येण्यासाठी सोबत एक पुस्तक घेतलं.
माझी सर्व कर्तव्यं पार पडल्यानंतर आणि इच्छांची पूर्तता झाल्यानंतर लगेचच ते पुस्तक माझ्या हातातून निसटून पडलं आणि मी गाढ झोपी गेलो.
त्याच क्षणी मी पर्वतामधून जाणार्या एका चिखलाने भरलेल्या अरुंद वाटेवर येतो. अंग गोठवणारी काळीकुट्ट रात्र. त्वचेवर झोंबणारा थंडगार वारा शुष्क झाडांमधून आवाज करत वाहत असतो. आभाळ गडद, शांत आणि भयानक, आणि बर्फ, धुळीप्रमाणे डोळ्यात जात असतो, चेहर्यावर येत असतो. कुठेही सजीव गोष्ट नाही. मी घाईने पुढे जातो आणि सातत्याने चिखलाच्या रस्त्यावरून डावीकडे किंवा उजवीकडे घसरून पडतो. मी पडत आणि थांबत चालत असतानाच माझा रस्ता सोडून देऊन भटकतपुढे जातो – कुठे ते माहीत नाही – आणि ही काही छोटीशी, नेहमीसारखी रात्र नसते, शंभर वर्षं वाटावीत इतकी मोठी असते, आणि मी पूर्ण वेळ चालत असतो, कसलाही पत्ता नसताना.
असाच मी बरीच वर्षं चाललो आणि कुठेतरी पोहोचलो, माझ्या मूळ देशापासून खूप, खूप दूर, जगाच्या एका अज्ञात भागामध्ये. एका अनोळखी जागेमध्ये जिच्याबद्दल कदाचित कोणालाच माहीत नसेल, आणि मला वाटतं, जी फक्त स्वप्नातच दिसत असेल.
त्या भागात फिरताना मी एका मोठ्या गावात आलो जिथे बरीच लोकं राहत होती. एका बर्याच मोठ्या बाजारामध्ये खूप गर्दी होती. खूप जोरात गोंधळ चालू होता, इतकाकी एखाद्याचे कान फाटून जातील.
मी एका मी बाजाराजवळच्या एका खाणावळीमध्ये गेलो आणि तेथील मालकाला ही इतकी लोकं इथे का जमा झाली आहेतअसं विचारलं…
– आम्ही खूप शांत आणि प्रतिष्ठित लोक आहोत, – त्याने सांगायला सुरुवात केली, – आम्ही न्यायाधीशांप्रती खूप निष्ठावंत आणि आज्ञाधारक आहोत.
– न्यायाधीश तुमचे प्रमुख सत्ताधारी आहेत का?– मीत्याला मध्येच थांबवून विचारले.
– न्यायाधीश इथे राज्य करतात आणि तेच आमचे प्रमुख सत्ताधारी आहेत; त्यांच्यानंतर येतात पोलीस.
मी हसलो.
– तू का हसतोयस?… तुला हे माहित नव्हतंका? कुठून आला आहेस तू?
त्याला मी माझा रस्ता कसा चुकलो आहे आणिसर्बिया नावाच्या एका दूरच्या प्रदेशातून आलो आहेते सांगितलं.
– या प्रसिद्ध देशाबद्दलतर मी ऐकलं आहे! – तो मालक स्वतःशीच कुजबुजत म्हणाला आणि माझ्याकडे आदराने पाहू लागला, आणि मग म्हणाला:
– आमच्याइथे हीच पद्धत आहे, न्यायाधीश येथे पोलिसांबरोबर राज्य करतात.
– तुमचे पोलीस कसे आहेत?
– इथे वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस आहेत. त्यांच्या हुद्द्यानुसारत्यांचे प्रकार पडतात. काहीपोलिस खूप प्रसिद्ध आहेत तर काही फार कमी प्रसिद्ध आहेत. आम्ही खूप शांत आणि प्रतिष्ठित लोक आहोत. पण बाजूच्या प्रदेशातून येणारे भटके, बेघर लोक आम्हाला भ्रष्ट करतात आणि वाईट गोष्टी शिकवतात. त्यामुळे आमच्या नागरिकांना बाकीच्या लोकांपासून वेगळं करण्यासाठी काल न्यायाधीशांनी आज्ञा दिली की आमच्या सर्व नागरिकांनी जवळच्या सभागृहात जायचं आहे, जिथे प्रत्येकाच्या कपाळावर कायमचा ठसा उमटवण्यात येईल. त्यामुळे इथे लोक एकत्र आले आहेत: आता काय करायचं हे ठरवण्यासाठी.
माझा थरकाप उडाला आणि मला वाटलं की मी या विचित्र जागेपासून शक्य तितक्या लवकर दूर पळून जावं, कारण मी जरी एक सर्बियन असलो, तरी मला अशाप्रकारे हिंमत दाखवण्याची सवय नव्हती आणि मी याबाबतीत जरासा अस्वस्थसुद्धा होतो.
तो मालकदयाळूपणे हसला, त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अभिमानाने म्हणाला:
– अरे माणसा, तू फक्त इतक्यानेच घाबरतोयस? नक्कीच तुला आमच्यासारखे धैर्य मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल!
– म्हणजे नेमकं काय करावं लागेल? – मी शांतपणे विचारलं.
– चांगला प्रश्न आहे! तुला समजेल आम्हीकितीशूर आहोत ते!आणि मी सांगू शकतो, तुला आमच्यासारखंशौर्यवान बनण्यासाठीअजून खूप काम करायचं आहे! तू खूप दूरचा प्रवास केला आहेस आणि जास्त जग पाहिलं आहेस, पण माझी खात्री आहे की तू आमच्या इतके शूर नागरिक कुठेही पाहिले नसशील! चल, दोघेही पुढे जाऊया. मला लवकर गेलं पाहिजे.
आम्ही बाहेर निघणारच होतो, इतक्यात मला दरवाज्याच्या समोर चाबकाचा एक फटकारा ऐकू आला.
मी वाकून पाहिलं:समोर एक खूपच विलक्षण दृश्य होतं. एकचमकदार फौजदारी टोपीघातलेला माणूस,भपकेदार पोषाखामध्ये,दुसऱ्या एका,खूप उत्कृष्ट प्रतीचे पण नागरिकांच्या दर्जाचे कपडे घातलेल्या,माणसाच्या पाठीवर बसून येत होता. तो खानावळी समोर थांबलाआणि पाठीवरील मनुष्य खाली उतरला.
मालक बाहेर गेला,त्या माणसासमोर नतमस्तक झाला, आणि तो भपकेदार पोषाखातला माणूस खाणावळीमधील एका विशेष सजवलेल्या टेबलाजवळ येऊन बसला.नागरिकांच्या कपड्यांतील दुसरा माणूसखाणावळीबाहेरच थांबला. मालकाने त्यालासुद्धा वाकूननमस्कार केला.
– हे सगळं काय आहे? – मी गोंधळून मालकाला विचारलं.
– जो खाणावळीमध्ये गेला तो एका मोठ्या हुद्द्यावरचा पोलीसअधिकारी आहे, आणि हा मनुष्य आमच्यातील एक प्रसिद्ध नागरिक आहे,जो खूप श्रीमंत आणि महान देशभक्त आहे, – मालक कुजबुजला.
– पण तो त्या दुसऱ्याला आपल्या पाठीवर का बसू देतो?
मालकाने मान हलवली आणि आम्ही बाजूला झालो. तो माझ्याकडे पाहून उपहासाने हसला आणि म्हणाला:
– आमच्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे जो काही लोकांनाच मिळतो! – त्याने याबरोबरच अजून काही गोष्टी सांगितल्या, पण मी इतका आश्चर्यचकित झालो होतो की मी त्या नीट ऐकू शकलो नाही. पण मी तो शेवटी जे म्हणाला ते अगदी स्पष्टपणे ऐकलं: – ही देशभक्ती करण्याची एक वेगळी पद्धत आहे जी अजून बाकीच्या देशांना समजून घेता आली नाहीय!
आम्ही सभेमध्ये आलो जिथे अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती.
पहिल्या गटाने कोल्ब असं काहीसं नाव असणार्या माणसाला अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उभं केलं, दुसर्या गटाने ताल्बची निवड केली आणि तिसर्या गटाचा सुद्धा स्वतःचा उमेदवार होता.
खूप भयानक गोंधळ उडाला होता, प्रत्येक गट त्यांच्या उमेदवारासाठी भांडत होता.
– मला वाटतं इतक्या महत्त्वाच्या सभेच्या अध्यक्षपदासाठी कोल्ब पेक्षा चांगलं दुसरं कोणीही नाही आहे,– पहिल्या गटातील एकजण म्हणाला, – कारण आपल्या सर्वांनाच त्याचे नागरिक म्हणून असलेले गुण आणि त्याच्या धैर्याची कल्पना आहे. मला वाटत नाही इथे याच्याशिवाय दुसरं कोणी असेल ज्याने कित्येक महत्त्वाच्या लोकांना आपल्या पाठीवर घेतलं असेल…
– याबद्दल बोलणारा तू कोण आहेस, – दुसर्या गटातील एकजण ओरडला. – तुझ्या पाठीवर तर कोणी साधा पोलिस कारकून सुद्धा बसला नाहीय!
– आम्हाला माहीत आहेत तुझे काय गुण आहेत ते, – तिसर्या गटातील एकजण म्हणाला. – तू तर चाबकाच्या एका फटकार्यामध्येच किंचाळू लागशील!
– एक गोष्ट आधी लक्षात घ्या, बंधूंनो! – कोल्ब बोलू लागला. – हे खरं आहे की बरेच महत्त्वाचे लोक अगदी दहा वर्षांपूर्वीपासून माझ्या पाठीवर बसत होते; त्यांनी चाबकाचे फटकारे मारले तरी मी तोंडातून एक शब्द काढला नाही. पण आता आपल्यात अजून जास्त पात्र असलेले लोक आहेत. तरुण आणि जास्त चांगले लोक पण आहेत.
– नाही, नाही, – त्याचे पाठीराखे बोलू लागले.
– आम्हाला या जुन्या सन्मानांबद्दल ऐकायचं नाहीय! कोल्बने लोकांना पाठीवर घेऊन दहा वर्षं होऊन गेली आहेत, – दुसर्या गटातील एक जण म्हणाला.
– तरुण रक्त आता पुढे येतं आहे, जुन्या कुत्र्यांना जुनी हाडंच चघळू द्या, – तिसर्या गटातील कोणीतरी म्हणाला.
अचानक सर्वत्र शांतता पसरली; लोक मागे जाऊन बाजूला होऊन रस्ता मोकळा करून देऊ लागले आणि मला साधारण तीस वर्षांचा एक तरुण दिसला. तो पुढे आला तशा सर्व माना झुकल्या गेल्या.
– कोण आहे हा? – मी हळूच खाणावळीच्या मालकाला विचारलं.
– हा एक लोकप्रिय नेता आहे. तरुण आहे,पण खूप हुशार आहे. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने प्रत्यक्ष न्यायाधीशांना तीनवेळा आपल्या पाठीवर घेतलं होतं. तो इथल्या सर्वांपेक्षा जास्त लोकप्रिय आहे.
– हे आता त्यालाच निवडतील का? – मी विचारलं.
– हे तर नक्कीच आहे, कारण बाकीच्या सर्व उमेदवारांबद्दल म्हटलं तर – ते सगळे म्हातारे झाले आहेत, त्यांच्यावर वयाचा परिणाम झाला आहे, पण कालच न्यायाधीश थोडा वेळ याच्या पाठीवर बसले होते.
– त्याचं नाव काय आहे?
– क्लेअर्ड.
त्यांनी त्याला मानाची जागा दिली.
– मला वाटतं, – कोल्बच्या आवाजाने शांतता भंग झाली, – की आपल्याला या पदासाठी क्लेअर्ड पेक्षा उत्तम दुसरं कोणीही मिळणार नाही. तो तरुण आहे, तरीही आम्हा वयस्कर लोकांपैकी कोणीही त्याच्या बरोबरीचं नाही आहे.
– होय, होय! … क्लेअर्डचा विजय असो! … – सर्व लोक ओरडले.
कोल्ब आणि ताल्ब त्याला अध्यक्षपदाच्या खुर्चीकडे घेऊन गेले. सर्वांनी झुकून अभिवादन केलं, आणि सर्वत्र अगदी शांतता होती.
– धन्यवाद, बंधूंनो, तुम्ही दिलेल्या या सन्मानासाठी आणि एकमताने मला या पदी विराजमान करण्यासाठीतुमचे आभार.तुम्हाला माझ्याकडून खूप जास्त आशा आहेत. आपल्या राष्ट्राच्या इच्छांचं जहाज अशा महत्त्वाच्या दिवसांमध्ये चालवत राहणं सोपं नाही आहे, पण मी तुमचा विश्वास सार्थ करण्यासाठी, तुमच्या मताचा सन्मान करण्यासाठी आणि तुमच्याकडून आदर संपादन करण्यासाठी मला शक्य ते सगळे प्रयत्न करेन. बंधूंनो, मला निवडल्याबद्दल तुमचे आभार.
– क्लेअर्ड! क्लेअर्ड! क्लेअर्ड! – सर्व बाजूचे लोक ओरडू लागले.
– आणि आता, बंधूंनो,मला आशा आहे की तुम्ही मला या महत्त्वाच्या घटनेविषयी काही शब्द बोलण्याची अनुमती द्याल. पुढे येणार्या या वेदना, हा त्रास सहन करणं अजिबात सोपं असणार नाही आहे. कपाळावर तप्त लोखंडाने ठसा उमटवुन घेणं सोपं नाही आहे. या वेदना सगळेच जण सहन करू शकत नाहीत. भित्रे थरथरतील, त्यांना भीतीने गारठून जाऊदे, पण आपण हे विसरलं नाही पाहिजे कि आपण आपल्या शूर पूर्वजांचे वंशज आहोत,त्यांचं उमदं रक्त आपल्याधमन्यांत सळसळत आहे.असं महान रक्त असलेले आपले पूर्वज,असे महान सरदार जे स्वातंत्र्यासाठीआणि पुढील पिढीच्या भल्यासाठीएका क्षणात आपले प्राण द्यायला सज्ज असायचे. त्यांच्या तुलनेत आपला त्रास हा फारच कमी आहे. आपण त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या अवस्थेत जगत आहोत,असं असतानाही आपण एखाद्या भित्र्या प्रजातीप्रमाणे राहायचं का? प्रत्येक खरा देशभक्त ज्याला संपूर्ण जगासमोर देशाची प्रतिष्ठा राखायची आहे तो या वेदना एखाद्या महान वीराप्रमाणे सहन करेल.
– बरोबर, बरोबर! क्लेअर्ड चा विजय असो.
क्लेअर्डनंतर बरेच उत्साही वक्ते आले, त्यांनी घाबरलेल्या लोकांना प्रेरणा दिली आणि क्लेअर्ड जे म्हणाला होता त्यातीलच बर्याच गोष्टी पुन्हा सांगितल्या.
यानंतरसुरकुतलेल्या चेहऱ्याचा व बर्फासारख्या पांढऱ्याशुभ्र दाढी व केसांचा एक जर्जर, वृद्ध मनुष्य बोलण्यासाठी उभा राहिला. त्याचे गुडघे वयोमानामुळे थरथरत होते, हात कापत होते, पाठ वाकली होती,आवाज कंप पावत होता आणि डोळे अश्रूंनी चमकत होते.
– मुलांनो, -त्याच्या सुरकुतलेल्या गालांवरून पांढऱ्या दाढीवर अश्रू ओघळत असतानाच त्याने सुरुवात केली, – मी म्हातारा झालो आहे आणि लवकरच मरून जाईन, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या नावाला हा बट्टा लावून घेतला नाही पाहिजे. मी शंभर वर्ष जगलो आहे आणि मी माझ्या आयुष्यात असं कधीच केलं नाही. मग आता म्हातारपणात मी का एखाद्या गुलामगिरीचा ठसा माझ्या पांढऱ्या, सुरकुतलेल्या कपाळावर लावून घेऊ?…
– बाहेर काढा त्या म्हाताऱ्याला! – अध्यक्ष ओरडला.
– बाहेर काढा त्याला! – बाकीचे ओरडले.
– घाबरट म्हातारा!
– तरुणांना प्रेरणा द्यायचं सोडून, तो सर्वांना घाबरवतो आहे!
– त्याला त्याच्या पांढऱ्या केसांची लाज वाटली पाहिजे! तो खूप जास्त जगला आहे आणितरीही तो घाबरतो आहे – आपण तरुणलोकच जास्त धैर्यवान आहोत..
– बाहेर काढा त्या भित्र्याला!
– हाकलून द्या त्याला!
– बाहेर काढा त्याला!
हे शूर आणि आणि तरुण देशभक्त त्या वृद्ध माणसाकडे धावत गेले आणि त्याला रागानेखेचू, ढकलू व लाथा मारू लागले.
शेवटी त्याला त्याच्या वयामुळे सोडून देण्यात आलं– नाहीतर त्यांनी त्यालादगडांनी ठेचून मारलं असतं.
त्यांनी उद्याच्या दिवशी शौर्य दाखवण्याची आणि या सन्मानासाठीव देशाची प्रतिष्ठा राखण्यासाठी पात्र असल्याचं सिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली.
सगळे जण अगदी व्यवस्थितपणे त्या सभेमधून बाहेर पडले. बाहेर पडताना ते म्हणत होते:
– उद्या आपल्याला समजेल कोणनक्की कोण आहे ते!
– आपण ढोंगी लोकांना उद्या वेगळं काढून टाकू!
– आता वेळ आली आहे ती लायक लोकांना नालायकांपासून वेगळं करण्याची, जेणेकरून कोणत्याही माणसाला त्याच्या नसलेल्या शौर्याबद्दल बढाया मारता येणार नाहीत!
–
मी खानावळीत परतलो.
– तू पाहिलंस आम्ही कशाचे बनलो आहोत ते? -मालकाने मला अभिमानाने विचारलं.
– हो, पाहिलं.– मी आपोआप उत्तर दिलं. मला जाणवत होतं की माझी विचारशक्ती कमी झाली आहे आणि माझं डोकं विचित्र गोष्टींनी गोंधळून गेलं आहे.
त्याच दिवशी मी त्यांच्या वर्तमानपत्रात पुढीलप्रमाणे असलेला एक अग्रलेखवाचला:
नागरिकांनो, आता आपल्यामधील खोट्या बढाया मारणार्या ढोंगी लोकांना थांबवण्याची वेळ आली आहे.आता काल्पनिक गुणवैशिष्ट्ये दाखवण्यासाठीजेनिरर्थक शब्द वापरले जायचे ते थांबवण्याची वेळ आली आहे. नागरिकांनो, आता आपल्या शब्दांची परीक्षाघेऊन कोण खरोखर लायक आहे आणि कोण नाही आहे हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे.हे तर नक्की आहे की आपल्यामधील घाबरट व्यक्तींनाठसा उमटवण्यासाठी जबरदस्तीने आणण्यात येणार नाही. आपल्यातील प्रत्येक जण, ज्याला त्याच्या शरीरात पूर्वजांचं उमदं रक्त वाहताना जाणवतंय, तो या वेदना आणि यातना अभिमानाने सहन करण्यासाठी सर्वात आधी पुढे येईल. हा त्याग आपल्या देशाच्या आणि आपल्या कल्याणासाठीच आहे. नागरिकांनो, उद्याचा दिवस आपली परीक्षा घेणारा असणार आहे
–
खाणावळीचा मालक सभेमधूनआल्यानंतरथेट झोपी गेला, जेणेकरुन दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी लवकरात लवकर जाता येईल. बरेच जण गावातील त्या सभागृहाच्या अगदी जवळ थांबले होते जिथून रांग सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी मी सुद्धा सभागृहाकडे गेलो, तिथे प्रत्येक जणउपस्थित होता. तरुण आणि वृद्ध, पुरुष आणि स्त्री. काही आयातर त्यांच्या लहान बाळांना हातात उचलून घेऊन आल्या होत्या. जेणेकरून त्यांच्या कपाळावर तोगुलामगिरीचा, किंवा त्यांच्यामते सन्मानाचा, ठसा लावता येईल. आणिमग त्यांना नागरी सेवांमध्ये मोठ्या हुद्द्यांवर जागा मिळू शकेल. गर्दीमध्ये ढकलाढकली आणि शिवीगाळसुद्धा चालू होती (याबाबतीत ते आम्हा सर्बियन लोकांसारखे आहेत याचा मला आनंद वाटला) आणि प्रत्येकजण सर्वात आधी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. काही जण तर दुसऱ्यांचा गळा पकडून त्यांना खेचत होते.
एकापांढरा गणवेशपरिधान केलेल्या विशेष नागरी सेवकाकडून हे ठसे उमटवले जात होते. जोलोकांना सतत शांत राहण्यासाठी सांगत होता:
– ओरडू नका,शांत रहा, प्रत्येकाची पाळी येईल. तुम्ही प्राणी नाही आहात, मला वाटतं आपल्याला ढकलाढकली न करताही हे काम करता येईल.
ठसे देणं सुरू झालं. एक जण ओरडला, दुसरा वेदनेने कळवळला, पणमी तिथे असेपर्यंततरी कोणीही अजिबात आवाज न काढताहे सहन करू शकलं नाही.
मी ही या यातना फार काळ पाहू शकलो नाही, म्हणून मी खानावळीत परत आलो. तिथेसुद्धा काहीजण परत येऊन खात पीत बसले होते.
– शेवटी झालंएकदाचं! – त्यांच्यातला एक जण म्हणाला.
– हो आपण तरी जास्त ओरडलो नाही. पण ताल्ब तर गाढवासारखा खिंकाळत होता. – दुसरा म्हणाला.
– पाहिलंस तुझा ताल्बकिती घाबरट आहे ते, आणि काल तू त्याला सभेचा अध्यक्ष बनवायचं बोलत होतास.
– हो,कधीकधी कोण कसं असेल सांगता येत नाही!
तेबोलत असतानाही वेदनेने कळवळत होते, पण हे एकमेकांपासून लपवत होते. कारण त्यांना आपण घाबरट आहोत असं दुसर्यांना कळू द्यायचं नव्हतं.
क्लेअर्डने स्वतःचं नाव कलंकित केलं,कारण ठसा लावून घेताना तोसुद्धा कळवळला, आणि लियर नावाचादुसराचएक जणशूरवीर ठरला, कारण त्याने आपल्या कपाळावर दोन ठसे उमटवण्यास सांगितलं व एकदाही तोंडातून आवाज काढला नाही. संपूर्ण गाव त्याच्याबद्दल अतीव आदराने बोलत होतं.
काही लोक पळून गेले,त्यांना बाकीच्यांनी खूप नावं ठेवली.
काही दिवसांनी डोक्यावर दोन ठसे असलेला लियर आपली मान उंचावून प्रतिष्ठेने, आत्मविश्वासाने, विजयाच्या भावनेने आणि अभिमानानेरस्त्यावरून चालत होता.प्रत्येक जण त्याच्यासमोर वाकत किंवा आपली टोपी उंचावून त्याला अभिवादन करत असत.स्त्री, पुरुष आणि मुलं त्याच्यामागून देशातील महान माणूस पाहण्यासाठी धावत. तो जिथे जिथे जाईल तिथे कुजबुज ऐकू येई: “लियर! लियर!… हा तोच आहे! हाच तो शूरवीर जो अजिबात ओरडला नाही,डोक्यावर दोन ठसे उमटत असतानादेखील याने तोंडातून आवाज काढला नाही!” वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमधून त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली जात होती.
त्याने हे प्रेम स्वतःची पात्रता सिद्ध करून मिळवलं होतं.
–
जवळपास सर्वच ठिकाणी मी त्याची स्तुती ऐकत होतो, आणि मला माझ्या धमन्यांतून प्राचीन आणि शौर्यवान सर्बियन रक्त सळसळताना जाणवलं. आमचे पूर्वजसुद्धा शूर होते,त्यांनीही स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आम्हालाही वैभवशाली इतिहास आहे. माझ्या मनात देशाभिमानाची आणि गर्वाची भावना वाढू लागलं आणि मला आमचा वंश किती हिंमतवान आहेहे सर्वांना सिद्ध करून दाखवण्यासाठी त्या सभागृहामध्ये धावत जाऊनओरडावंसं वाटलं की:
– तुम्ही तुमच्या लियरची इतकी स्तुती का करता? तुम्ही खरे वीर पाहिलेच नाही आहेत! इथे या आणि सर्बियन रक्त किती हिंमतवान असतं ते स्वतः पहा!फक्त दोनच नाही तर माझ्या डोक्यावर दहा ठसे उमटवा.
पांढऱ्या वेषातल्यात्या नागरी सेवकानेलाल,तप्त लोखंडी ठसा माझ्या कपाळाजवळ आणला, आणि मी… मी स्वप्नातून जागा झालो.
मीभीतीनेचमाझ्या कपाळावरून हात फिरवला,देवाचं स्मरण केलं आणि माझ्या स्वप्नात या कसल्या गोष्टी येतायत याचा विचार करू लागलो.
– मी जवळ जवळ लियरच्या कामगिरीचं महत्त्वकमी केलं होतं, – मी विचार केला आणि मला हायसं वाटलं.
मी कुशीवर वळलोपण मला काहीसं अस्वस्थ वाटत होतं कारण माझं स्वप्न पूर्ण झालं नाही.
बेलग्रेड मध्ये, १८९१.
“रदोये डोमानोविच” प्रकल्पासाठी अनुवादक अभिषेक शेट्ये, २०२०.
छाप
मैले एउटा भयानक सपना देखेँ। म सपनाबाट खासै त्यति अचम्बित हुन्न, तर म यस्तो भयानक सपना देख्ने साहस कसरी पाउँछु भन्ने कुरामा अचम्बित छु, जो आफै एउटा ज्ञानी र आदर्णीय नागरिकमा पर्छु, जो हाम्री प्रिय पीडित आमा सर्बियाको आज्ञाकारी सन्तानमा पर्छु, अरु सन्तानहरु जस्तै। तिमीलाई अवश्य थाहा छ कि, यदि म कुनै कुरामा अपवाद भएको भए, यो कुरा फरकै हुन्थ्यो, तर मेरो प्रिय साथी यो होइन, म ठ्याक्कै अरुले जस्तै काम गर्छु र सबै काम सावधान भएर गर्ने कुरामा मलाई खासै कसैले पनि नभेटाउला। मैले एकचोटी सडकमा प्रहरी पोशाकको चम्किलो टांक देखेँ, लगभग छुट्टिनै लागेको ठाउँमा र त्यसको जादुइ चमकलाई घुरिरहें जुन मिठो सम्झनाले भरिपुर्ण थियो। तब अचानक मेरो हात काम्न थाल्यो र सलाम ठोक्यो, मेरो शीर त्यसै धर्ती तिर झुक्यो र मेरो ओँठमा मिठो मुस्कान छायो जुन मुस्कान हाम्रा अग्रजहरुलाई अभिवादन गर्दा छाउँछ।
– मेरा नसाहरुमा कुलीन रगत बग्दछ – यही त हो – मैले त्यो क्षण यही भन्ठाने र त्यो टांकलाई लापरवाहीले कुल्चिएर जाने राक्षसी बटुवाहरुलाई तिरस्कार पूर्वक हेरें।
– ए राक्षस! – मैले यो तीतोपनसंग बोलेँ र थुकें, र चुपचाप हिड्न थालेँ, आफ्नो सोचलाई सान्त्वना दिएँ कि यस्ता राक्षस यहाँ थोरै छन् ; र म खासमा खुसी थिएँ की भगवानले मलाई परिष्कृत हृदय र हाम्रा पूर्वजहरूको कुलीन, प्रतिद्वन्द्वी रगत दिनु भएको थियो।
लौ, अब तिमी बुझ्न सक्छौ की म कति अद्भुत मान्छे हुँ, जो अरु सम्मान्नीय नागरिकहरु भन्दा फरक छैन र यस्मा कुनै शंका छैन तिमी अच्म्बित हुनेछौ कसरी यस्त्तो भयानक र मूर्ख कुराहरु मेरो सपनामा देखा पर्न सक्छ।
त्यो दिन मलाई केहि असमान्य भएको थिएन। मेरो राम्रै रात्री भोजन भयो र पछि फुर्सदमा दाँत कोटाउँदै बसेँ; अलि अलि मदिरा पिउँदै, अनि यस्तो साहसी र इमान्दारी पूर्वक आफ्नो नागरिक हुनुको अधिकार प्रयोग गर्दै म आफ्नो ओछ्यान तिर गएँ र छिट्टै निदाउनको लागि किताब लिएँ।
मेरो हातबाट किताब चाँडैनै चिप्ल्यो, अवश्य नै, आफ्ना चाहनालाई सन्तुष्ट बनाई, आफ्ना कर्तब्य निभाई, म निर्दोष भेडा जसरी मस्त सुतेँ।
एकैचोटी मैले पहाडहरु मार्फत गईरहेको साँघुरो, हिलो सडकमा आफुलाई पाएँ। त्यो चिसो, अन्धकार रात। सुकेका हाँगाहरु बीच बतास कराउँछ र जब यी नांगा छालामा ती बतासले स्पर्स गर्छ तब छुरा जसरी काट्छ। पुरै कालो, सुनसान र तर्साउने आकाश र धुलो जस्तो हिउँ, आँखाभित्र पसिरहनी र अनुहारलाई हानिरहनी। कहिँ पनि कुनै जीवित आत्मा देखिदैन। म हतारिन्छु तर हरेकपल्ट म त्यो हिलो सडकमा कैले दायाँ त कैले बायाँ चिप्लिन्छु। म ठक्कर खाँदै लड्दै आफ्नो बाटो गुमाउँछु, म अल्मलिन्चु – यो भगवान जानुन म कहाँ छु – यो कुनै छोटो र सामान्य रात थिएन, एउटा सताब्दी झैं लामो थियो, आफु कहाँ छु केहि थाहा नभई हरेक समय हिड्दै थिएँ।
यसरी नै म धेरै वर्ष निरन्तर हिडेपछि कहिँ आइपुगें, आफू जन्मिएको देशभन्दा टाढा, निकै टाढा, यो संसारको एउटा अन्जान भागमा, अनौठो भूमिमा। लाग्छ यो ठाउँको बारे कसैलाई पनि थाह छैन, म निश्चित छु की यो ठाउँ सपनामा मात्र देख्न सकिन्छ।
म डुल्दाडुल्दै एउटा ठुलो शहरमा आइपुगेँ जहाँ थुप्रै मानिसको बसोबास थियो। त्यहाँको ठूलो बजारमा धेरै नै भिड थियो, अजिब अजिबको धुनहरु कानको झली नै फुटाउला जसरी घन्की रहेको थियो। म बजार तिर फर्किएको एउटा सरायमा पुगेँ र त्यहाँको घरधनिलाई सोधें, किन यति धेरै मानिस जम्मा भएका…
– हामी शान्त र इजत्दार मानिस हौँ – उसले आफ्नो कथा आरम्भ गर्यो – हामी मुखियाप्रति वफादार र आज्ञाकारी छौँ।
– मुखिया यहाँको सर्वोच्च अधिकारी त होइन होला, कि हो? – उसका कुरा अवरोध गर्दै मैले सोधेँ।
– यहाँ मुखियाले शासन गर्नुहुन्छ र उनी नै हाम्रो सर्वोच्च अधिकारी हुन्; प्रहरी त पछि आउँछ।
म हाँसे।
– तिमी किन हाँसेको?… के तिमीलाई थाहा थिएन?… तिमी कहाँबाट आयौ?
मैले उसलाई आफूले बाटो बिराएको र म निकै टाढाको भूमि – सर्बियाबाट आएको बताएँ।
– मैले त्यो प्रख्यात देशको बारे सुनेको छु! – घरधनी आफैसँग बरबराए, मलाई इज्जतका साथ हेरे अनि ठूलो स्वरले बोले:
– यो हाम्रो आफ्नै तरिका हो, – उ बोल्दै गयो, – मुखियाले आफ्ना प्रहरीहरु लिएर यहाँ शासन गर्छन।
– यहाँका प्रहरीहरु कस्ता छन्?
– खास, यहाँ धेरै प्रकारका प्रहरीहरु छन् – आफ्ना तह अनुसार विभाजित छन्। यहाँ कोहि उच्चस्तरमा त कोहि निम्नस्तरमा विभाजित छन् … थाहा छ तिमीलाई? हामी शान्त र इजत्दार ब्यक्ति हौँ तर छिमेकका विभिन्न किसिमका डुलुवाहरु यहाँ आउँछन्, हामीलाई बिगार छन् र खराब कुराहरु सिकाउँ छन्। अरु मान्छेहरु बिच हाम्रा नागरिकहरु चिन्नको लागि मुखियाले हिजो आदेश दिएका छन् कि हाम्रा हरेक नागरिकहरु स्थानिय अदालतमा गई, आफ्ना निधारमा छाप लगाउनु पर्छ। यसै कारण यहाँ यति धेरै मानिसहरुको जमघट छ: अब के गर्ने भनि सल्लाह गर्न।
म सिरिङ्ग भएँ र सोचें यस्तो अनौंठो ठाउँबाट सकेसम्म जति सक्दो चाँडो भाग्नुपर्छ किनेकी म सेर्बियन् भएपनि, यस्तो चालचलनको प्रदर्सनसँग मेरो लगाब छैन र मलाई यो कुरा अलि चित्त बुझेन।
– ए, यात्री, के यति कुराले नै तर्सियौ? यसमा आश्चर्य छैन, तिमीलाई हाम्रो जस्तो शाहस पाउनको लागि अझै लामो बाटो हिड्नुपर्छ।
– अनि के चाहिँ गर्न खोज्दै छौ? मैले डराउँदै सोधेँ।
– यो कस्तो प्रश्न! तिमीले देख्ने छौ हामी कतिको बहादुर छौँ भनेर। तिमीलाई हाम्रो जस्तो शाहस पाउन त अझै धेरै लामो बाटो हिड्नुपर्छ। तिमीले निकै टाढा अनि थुप्रै ठाउँको यात्रा गर्यौ र यो दुनिया देख्यौ, तर म निश्चित छु, तिमीले हामी भन्दा ठूला नायकहरु कहिँ पनि देखेको छैनौ। हामी त्यहाँ सँगै जाऔं। मैले हतार गर्नु पर्छ।
हामी निस्किनै लाग्दा, हामीले ढोका अगाडी कोर्राको स्वाँट सुन्यौं।
मैले बाहिर च्याएर हेरेँ: त्यहाँ निहार्न दृष्य थियो – शिरमा चम्किलो तीन सिङ्गे टोपी लगाएको, भद्दा सूट पहिरेको एउटा मान्छे, साधारण नागरिक झल्काउने एकदम महँगो पोशाक पहिरेको अर्को मान्छे पछाडी सवार थियो। उ सराय अगाडी रोकियो र सवार त्यहाँ ओर्लियो।
घरधनी बाहिर गयो, भुइँ तिर झुक्यो, र भद्दा सूट लगाएको मान्छे सराय भित्र गयो, विशेष गरी सृंगारिएको टेबल तर्फ। नागरिक पोशाक लगाएको मान्छे सराय अगाडी नै पर्खी बस्यो। घरधनी उसको अगाडी पनि झुक्यो।
– यो सब के हो? – मैले घरधनीलाई सोधेँ, एकदम अलमल्ल पर्दै।
– खास, सराय भित्र गएका उच्च तहका प्रहरी हुन्, र यी व्यक्ति भने उच्चस्तरका नागरिकहरु मध्य एक हुन्, धेरै धनी र महान देशभक्त – घरधनीले कानेखुसी गरे।
– किन उसले अर्कोलाई आफ्नो पछाडी सवार हुन दियो?
घरधनीले म तिर टाउको हल्लायो र हामी छेउतिर लाग्यौं। उसले चित्त नबुझ्दो मुस्कान दियो र भन्यो:
– हामी यसलाई ठुलो सम्मानका रुपमा लिन्छौं जसको हामी विरलै योग्य हुन्छौँ। -उसले मलाई अरु थुप्रै कुराहरु पनि भन्यो, तर म यति उत्सुक थिएकी मैले सबै कुरा समात्न सकिन। तर मैले अन्तिममा एउटा कुरा प्रष्ट सुने: – यो एक देशको सेवा हो जुन सबै राष्ट्रहरूले अझ कदर गर्न सिकेका छैनन्!
–
हामी बैठकमा आएका थियौं र अध्यक्षको छनौटको लागि चुनाव सुरु भइसकेको थियो।
यदि मलाई नाम ठीकसँग याद छ भने, अध्यक्षको उम्मेदवारको रूपमा; पहिलो समूहले कोल्ब भन्ने मानिस राख्यो, दोस्रो समूह ताल्ब चाहन्थ्यो, र तेस्रोको आफ्नै उम्मेद्वार थियो।
त्यहाँ डरलाग्दो भ्रम थियो; प्रत्येक समूहले आफ्नै मान्छे राख्न चाहान्थे।
– मलाई लाग्छ कि हामीसँग यस्तो महत्त्वपूर्ण बैठकको कुर्सीको लागि कोल्ब भन्दा राम्रो मानिस अरु छैन, – पहिलो समूहबाट आवाज उठ्यो, – किनभने हामी सबैलाई राम्ररी थाहा छ, एक नागरिकको रूपमा उसका गुणहरू र उसको ठूलो साहस। मलाई लाग्दैन कि यहाँ हामी मध्ये कोही छ जसले वास्तवमै महत्वपूर्ण व्यक्तिहरूको सवार बारम्बार भएकोमा गौरब गर्न सक्छ…
– यसको बारेमा कुरा गर्न तपाईं को हो र? – दोस्रो समूहबाट कोहि चिच्यायो – तपाईंलाई तल्लो दर्जाको प्रहरी कर्मचारीले समेत सवार दिएको छैन!
– हामीलाई थाहा छ तपाईंका गुणहरु के हो, – तेस्रो समूहबाट कोहि चिच्यायो। – तपाईंले बिना रोदन कोर्राको एक स्वाँट पनि सहन सक्नु हुन्न।
दाजुभाइहरू! सीधा कुरा गरौं – कोल्बले भन्यो – यो सत्य हो कि दस वर्ष जस्तै पहिले प्रतिष्ठित व्यक्तिहरू मेरो पीठमा सवार थिए; तिनीहरूले मलाई कोर्रा लगाए र म कहिले रोइन, तर हामी मध्ये पनि धेरै योग्य मानिसहरु हुन सक्छन्। जवान उमेरका पनि त उत्कृष्ट हुन सक्छन्।
– हुदैन, हुदैन – उनका समर्थकहरू कराए।
– हामी मिति समाप्त भई सकेका सम्मानहरुको बारेमा सुन्न चाहन्नौँ। कोल्ब माथि सवार भएको दश बर्ष भइसक्यो – दोस्रो समूहका आवाजहरू कराए।
– जवान रगत उडाउँदै छन्, पुराना कुकुरहरूलाई पुरानै हड्डीहरू चपाउन दिनुहोस् – तेस्रो समूहबाट कोही बोल्छ।
– अचानक त्यहाँ केहि आवाज थिएन; एउटा मार्ग खाली गर्नका लागि मान्छेहरु पछाडी, दायाँ र बायाँ सर्न थाले र मैले तीस उमेर जतिको जवान व्यक्ति देखेँ। उहाँ नजिक पुग्दा, सबै टाउको निहुरिए।
– उहाँ को हो? – मैले घरधनीलाई कानेखुशी गर्दै सोधेँ।
– उहाँ लोकप्रिय नेता हुनुहुन्छ। एक जवान मानिस, तर धेरै आशाजनक। आफ्नो शुरुआती दिनमा उनले तीनपटक मुखियालाई आफ्नो ढाड पछाडी बोकेकोमा गर्व गर्न सक्थ्ये। उहाँ अरू कोही भन्दा धेरै लोकप्रिय हुनुहुन्छ।
– तिनीहरूले सम्भवतः उनलाई नै छान्छन्? – मैले सोधपुछ गरेँ।
– त्यो पक्का निश्चित नै छ, किनकि अन्य सबै उम्मेद्वारहरू – तिनीहरू सबै पाको उमेरका छन्, उनीहरू समय भन्दा धेरै पछाडी परिसके, जबकि मुखिया हिजो उनको पीठमा केहि समयको लागि सवार भए।
– उसको नाम के हो?
– क्ल्यर्द।
तिनीहरूले उहाँलाई सम्मान दिए।
– मलाई लाग्छ, – कोल्बको आवाजले मौनता छायो – कि हामी क्ल्यर्दभन्दा राम्रो मानिस यस पदको लागि पाउने छैनौँ। उनी जवान छन्, तर हामी पाको मध्य कोही पनि उनको बराबरी छैनौँ।
– सुन, सुन!… क्ल्यर्दको जय होस्!… सबको आवाज गर्जियो।
कोल्ब र ताल्बले उनलाई अध्यक्षको पदमा लगे। सबैजनाले आफ्ना शिर झुकाएर, र त्यहाँ पूर्ण मौनधारण थियो।
– धन्यवाद दाजुभाइहरु, तपाईहरुको उच्च सम्मान र यो इज्जतको लागि, तपाईहरुले जुन मलाई सर्वसम्मतिले प्रदान गर्नुभयो। तपाईका आशाहरू, जो अब ममा निर्भर छन्, प्रशंसाले भरिपुर्ण छन्।
यस्तो महत्त्वपूर्ण दिनहरूका साथ देशको ईच्छाको जहाजलाई चलाउन सजिलो छैन, तर म तपाईंहरुको विश्वासलाई प्रमाणित गर्न मेरो शक्तिले भ्याएको जति सबै गर्नेछु, ईमानदारीसाथ तपाईंहरुको राय प्रतिनिधित्व गर्न, र तपाईहरुको उच्च सम्मान योग्य हुन। धन्यवाद मेरा दाजुभाइहरु, मलाई छान्नु भएकोमा।
– र अब, दाजुभाइहरु, म आशा गर्छु तपाईंहरु मलाई यो महत्त्वपूर्ण दिनबारे केहि शब्द बोल्न अनुमति दिनुहुन्छ। यस्तो दु: ख भोग्नु सजिलो छैन, यस्ता सास्तीहरु अझै आउनेछन् ; एउटाको निधारमा तातो फलामको छाप लगाउनु सजिलो छैन। वास्तवमै होईन, – ती दुखाइ हुन् जुन् सबै मानिसले सहन सक्दैनन्। डरपोकलाई डरले काम्न दिनुहोस्, उनीहरू डराएर डराउन्, तर हामीले यो बिर्सनु हुँदैन कि हामी वीर बहादुर पुर्खाहरूका छोराहरू हौं, महान रगत हाम्रो रगमा दौडन्छ, हाम्रा हजुरबा हजुरआमाको वीर रगत, ती वीर योद्धाहरू जो स्वतन्त्रताको लागि र हामी सबैको भलाइको लागि, आफ्नो सन्तानको लागि बिना संकोच मर्दछन्। हाम्रो दु: ख त् कमै हो, यदी उनीहरुको भोगाई सोच्ने हो भने – हामी पहिलेको भन्दा अझ राम्रा जीवनशैलीमा बाँच्दै गर्दा, के अब आएर पतित र डरपोक जातका सदस्यहरू जस्तो व्यवहार गर्ने छौं? प्रत्येक साँचो देशभक्त, जसले हाम्रो राष्ट्रलाई सारा विश्वको अगाडि लाजमा पार्न चाहँदैन, उसले मर्द र वीर नायकले जस्तै कष्ट सहने छ।
– हुर्रे! हुर्रे! हुर्रे! – मतदाताहरु कुना कुनाबाट गर्जिए।
– सुन, सुन!… क्ल्यर्दको जय होस्!
क्ल्यर्द पछि, त्यहाँ धेरै उत्कृष्ट वक्ताहरू थिए; तिनीहरूले डराएकाहरूलाई प्रोत्साहित गरे र क्ल्यर्दको भनाईलाई धेरैथोरै फेरी दोहोर्याए।
त्यसपछि एउटा थकित, अनुहार चाउरी परेको, कपाल र दाह्री हिउँ जस्तो सेतो भएको बृद्धले बोल्न अनुमति मागे। उनको घुँडा वयस्कसँगै थरथर काम्दै थियो, उसका हातहरू काम्दै थिए, ढाड कुप्रेको थियो। उनको आवाज थरथर काँमेको थियो र आँखा आँसुले भरिपूर्ण थिए।
– बच्चाहरू, – उनले शुरू गरे, उनको अनुहारबाट आँसु झर्दै चाउरी परेकोको गाला र उसको सेतो दाह्रीमा खसे – म दयनीय र मर्न लागेको अवस्तामा छु, तर मलाई लाग्छ तिमीहरुले त्यस्तो लाज नमान्नु नै राम्रो थियो। म सय वर्षको भएँ, र मैले यो बिना नै आफ्नो सम्पूर्ण जीवन बिताएको छु! तर अहिले आएर गुलामीको चिनो किन अब मेरो सेतो र थकित टाउकोमा छाप्नु पर्यो?…
– तल झार त्यो पाको बुदालाई – अध्यक्ष कराए।
– झार त्यसलाई – अरु पनि चिच्याए।
– कायर बुढा!
– बरु युवालाई प्रोत्साहित गर्नुको सट्टा, झन् सबैलाई तर्साउँदै छ!
– उ आफ्नो खैरो कपालप्रति लज्जित हुनुपर्छ! उ लामो समयसम्म बाँच्यो छ तर उ अझै डराउँछ – हामी जवान नै बढी साहसी छौं…
– तल झार कायरलाई!
– त्यसलाई बाहिर फ्याक!
– तल झार त्यसलाई!
साहसी देशभक्त युवाको एक क्रोधित भीड ती वृद्ध मानिसमाथि दौडिए र उनीहरूले रिसमा धक्का दिन, तान्न र लात हाल्न थाले।
तिनीहरूले अन्ततः उसको उमेरका कारण उसलाई जान दिए – नत्र तिनीहरूले उसलाई जिउँदै गाड्थ्ये।
उनीहरू सबैले भोलिदेखि बहादुर बन्ने र आफू आफ्नो देशको सम्मान र गौरवको लागि योग्य हुने वचन दिए।
मानिसहरू उत्कृष्ट क्रममा बैठकबाट टाढिए। छुट्टिने क्रममा उनीहरूले भने:
– भोलि हामी देख्नेछौँ, को कस्तो छ!
– गफाडीहरुलाई हामी भोलि छान्ने छौं!
– योग्यको लागि अयोग्यबाट आफूलाई छुट्याउने समय आएको छ, ताकि प्रत्येक बदमाशले आफ्नो बहादुर हृदय रहेको झुटो गफ दिन सक्नेछैन!
– म सरायमा फर्किएँ।
– तिमीले देख्यौ हामी केले बनेका छौं? – मेरो घरधनीले गर्वका साथ मलाई सोधे।
– वास्तवमै मैले देखें, – मेरो शक्तिले मलाई त्यागि रहेको र मेरो मस्तिस्क अनौठो छापले गुञ्जि रहेको अनुभव गर्दै, मैले अन्जानमै जवाफ दिएँ।
त्यो दिन मैले उनीहरूको पत्रिकामा एउटा अग्रणी लेख पढें जुन यस प्रकार छ:
– नागरिकहरू, हामी बीचमा यो बेकारको घमण्ड र देखावटी रोक्ने समय आएको छ; अर्थहिन शब्दलाई सम्मान गर्नबाट रोक्ने समय आएको छ जुन हामी हाम्रो काल्पनिक सद्गुण र मरुभूमि प्रदर्शन गर्न भ्रममा प्रयोग गर्दछौं। समय आइसकेको छ, नागरिकहरू, हाम्रो शब्दहरू परीक्षण गर्ने र वास्तवमै को योग्य छ र को छैन भनेर चिनाउने! तर हामी विश्वास गर्छौं कि हामी बीचमा कुनै लाजमर्दो डरपोक हुनेछैन जसलाई नियुक्त गरिएको ठाउँमा बलपूर्वक ल्याउनुपर्नेछ। हामीमध्ये हरेक जना जसले आफ्नो नसामा महान पुर्खाको रगत महसुसु गर्दछ, उ यो पवित्र पीडाको लागि गौरवका साथ चुपचाप दुःख र कष्ट सहने पहिलो व्यक्ति हुन संघर्ष गर्दछ, यो हाम्रो देशको भलाइ र हामी सबैको भलाइको लागि बलिदान हो। अगाडि बढ, नागरिकहरू, भोलि महान परीक्षाको दिन हो!…
अर्को दिन तोकिएको ठाउँमा सकेसम्म चाँडो पुग्न मेरो घरधनी बैठक पछि सिधै सुत्न जानुभयो। यद्यपि, धेरै जना भने, भोली आफू पंक्तिमा अगाडी हुनको लागि सिधा शहरको हलमा गएका थिए।
अर्को दिन म पनि शहरको हलमा गएँ। त्यहाँ सबैजना थिए – जवान र बुढा, पुरुष र महिला। केही आमाहरूले आफ्ना साना बच्चाहरूलाई आफ्ना पाखुरामा ल्याए ताकि तिनीहरू पनि दासत्वको चिन्नले छापिउन्, त्यो सम्मानको कुरा हो, र त्यसैबाट निजामती सेवामा उच्च पद पाउन अझ बढी अधिकार प्राप्त गर्न सकुन्।
त्यहाँ धक्का र शपथ थियो (यो कुरामा तिनीहरू हामी सर्बहरू जस्तै थिए, र यसमा म अलि खुशी थिएँ), र सबैजना ढोकामा पहिलो हुन प्रयास गर्दै थिए। कोहि त अझ अरुहरुको ठाउँ पनि हडप्दै थिए।
सेता, औपचारिक सूट लगाएका एक विशेष सरकारी कर्मचारीद्वारा छाप लगाइएको थियो, जो नम्रतापूर्वक मानिसहरूलाई निन्दा गर्दै थियो:
– भगवानको खातिर, गनगन नगर्नुस्, सबैको पालो आउनेछ – तपाईंहरु जनावर हुनुहुन्न, म मान्दछु कि हामी शोक नगरी व्यवस्थापन गर्न सक्दछौं।
छपाईँ शुरू भयो – एकजनाले चिच्यायो, अर्कोले विलाप मात्र गर्यो, तर म त्यहाँ हुनु जेल आवाज ननिकाली यो सहन सक्षम कोहि थिएन।
यो यातना मैले लामो समयसम्म हेर्न म सकिन, त्यसैले म सराय फर्कें, तर कोही-कोही पहिलै त्यहाँ पुगेर खानपिन गर्दै थिए।
– त्यो सकियो! – ती मध्ये एकले भन्यो।
– ठिक छ, हामी वास्तवमै चिच्याएनौं, तर ताल्ब गधाले जस्तो कराई रहेको थियो!… – अर्कोले भन्यो।
– तपाईले देख्नु भयो नि तपाईको ताल्ब कस्तो रहेछ, र तपाई उसलाई हिजो बैठकको अध्यक्षको रुपमा राख्न चाहानुहुन्थ्यो।
– अँ, तपाईंलाई कहाँ थाहा हुन्छ र!
तिनीहरू बोले, पीडा र हठी साथ विलाप लिईरहे, तर एक अर्काबाट लुकाउन कोशिस गर्दै थिए, किनकि प्रत्येकले आफू डरपोक सोच्दा लाज लाग्छ।
क्ल्यर्दले आफैलाई बदनाम गर्यो किनभने उ कराइरहेको थियो, र लियर नाम गरेको मानिस एक नायक थियो किनकि उसले आफ्नो निधारमा दुईवटा चिन्ह छाप्यो र कहिल्यै पीडाको आवाज दिएन। सबै शहरले उसको बारेमा ठूलो सम्मानका साथ कुरा गरिरहेको थियो।
केही मानिसहरू भागेर गए, तर तिनीहरुलाई सबैले घृणा गरे।
केही दिन पछि, त्यो व्यक्ति जसले निधारमा दुईवटा छाप लगाएका थियो, उ शिर माथि उठाएर हिंड्यो, सम्मान र आत्मसम्मान संग, महिमा र गर्वले भरिपूर्ण, र जहाँ जहाँ उ गयो, त्यो दिनको नायकलाई सलाम दिन सबै निहुरिए र आफ्नो टोपी फुकाले।
पुरुष, महिला र केटाकेटीहरू राष्ट्रको महान मानिस हेर्न सडकमा उसको पछिपछि कुदे। उ जहाँ जहाँ गयो, प्रेरणाले भरिएको गनगनले उसलाई पछ्यायो: ‘लियर, लियर!… त्यो उहाँ हो!… त्यो नायक हो जसले आफ्ना निधारमा दुईवटा चिन्ह छाप्दा पनि रुएनन्, आवाज पनि निकालेनन् !’ उ अखबारको शीर्षकमा थियो, प्रशंसा र महिमाले भरिपुर्ण। र उ मानिसहरूका माया पाउन योग्य थियो।
– जताततै म यस्तो प्रशंसा सुन्दैछु, र मेरो नसामा पुरानो, महान सर्बियाई रगत बगिरहेको महसुस गर्न थाल्छु, हाम्रा पुर्खाहरू नायक थिए, उनीहरू स्वतन्त्रताको लागि तीरहरुमा रोपिएर मरे; हामीसँग पनि हाम्रो वीरताको इतिहाँस र हाम्रो कोसोभो छ। म मेरो राष्ट्रको गर्व र अहंकारले उत्साहित हुन्छु; मेरो नस्ल कत्ति बहादुर छ भनेर देखाउन र शहरको हलतिर दौडेर गएर सुनाउन:
– तिमीहरु किन लियरको प्रशंसा गर्छौ?… तिमीहरुले कहिल्यै साँचो नायकहरू देखेका छैनौ! आउ र आफै हेर यो महान सर्बियाई रगत कस्तो छ! मेरो टाउकोमा दसवटा छाप लगाई देउ, दुई मात्र होइन!
सेतो सूटमा सरकारी कर्मचारीले उसको छाप मेरो निधारमा ल्यायो, र मैले सुरु गरें… म मेरो सपनाबाट ब्यूँझें।
मैले डरले आफ्नो निधार पुसें, मेरा सपनाहरुमा देखा पर्ने अनौठो चीजहरुमा आश्चर्य पर्दै।
– मैले झन्डै उनीहरुको लियरको महिमालाई बढि छायांकन गरें। – मैले सोचें र सन्तुष्ट भए, फर्किए, र मलाई अलि दु: ख लागेको थियो कि मेरो सपना अन्त्यसम्म पुगेन।
बेलग्रेडमा, १८९९|
“रादोये डोमानोभिक” परियोजनाको लागि दिपक रावत द्वारा अनुवादित, २०१९|