Tag Archive | इतिहास

नेता (३/३)

(मागील पान)

अशाप्रकारे, पहिला दिवस गेला आणि पुढचे काही दिवस सुद्धा असेच गेले. काही महत्त्वाचं असं घडलं नाही, फक्त लहान-सहान गोष्टीच: ते आधी सरळचालत एका खड्ड्यात पडले, त्यानंतर एका दरीमध्ये;ते ब्लॅकबेरीच्या झुडपांवर घासले गेले;त्यांच्या पायात बरेच काटे रूतले; बर्‍याच जणांचे हात आणि पाय तुटले; काही जणांच्या डोक्यावर मार लागला. पण या सर्व यातना सहन केल्या गेल्या. काही वृद्ध प्रवाशांना रस्त्यावर मृतावस्थेत सोडून देण्यात आलं.“ते जर घरी थांबले असते तरीसुद्धा मेलेच असते.प्रवासामध्ये आले आहेत म्हणून असं झालं असं नाहीय!“वक्ता बाकीच्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देण्यासाठीम्हणाला.  काहीएक दोन वर्षांची लहान मुलं सुद्धा मरण पावली. पालकांनी त्यांच्या हृदयावर झालेलेहे घावमोठ्या कष्टाने सहन केले आणि हीच देवाची इच्छा आहे असं मानलं.“मुलं जितकी लहान, तितकं त्यांच्या मरणाचं दुःख कमी! जेव्हा ते अगदीच लहान असतात तेव्हा दुःख सर्वात कमी असतं. देवा, कोणत्या पालकांची मुलं लग्नाच्या वयात आल्यावर मरण नको पावू देत!जर मुलांच्या नशिबात मृत्यू असेल, तर तो आधीच आलेला बरा, त्यामुळे जास्त दुःखतरी होणार नाही!“ वक्त्यानेपुन्हा एकदा त्यांचं सांत्वन केलं. काहीजणांनी आपल्या डोक्याभोवती कपडे गुंडाळले होतेआणि आपल्या जखमांवर थंड पट्ट्या लावल्या होत्या.काहीजणांनीकपड्याचा पट्टा बनवून आपले हात गळ्याभोवती बांधून ठेवलेहोते. सगळ्यांचे कपडे फाटले आणि कापले गेले होते,चिंध्या होऊन लटकत होते, पण तरीही ते पुढे चालत राहिले. जर त्यांना सारखी भूक लागली नसती तर हे सगळं सहन करणं सोपं झालं असतं.

एका दिवशी काहीतरी वेगळंच घडलं.

नेता सर्वांच्या पुढे चालत होता, त्याच्याभोवती समूहामधील सर्वात शूर पुरुष होते.(त्यांपैकी दोघेजण उपस्थित नव्हते आणि ते कुठे गेले हेही कोणाला समजलं नाही. सर्वांनी असं गृहीत धरलं की ते हार मानून पळून गेले.एकदा वक्ताआपल्या भाषणात त्यांच्या विश्वासघाताबद्दल बोलला होता. पण फक्त काही जणांनाच असं वाटत होतं की ते दोघे प्रवासातच मृत पावले पण बाकीचे चिडतील म्हणून त्यांनी हे बोलून दाखवलं नाही.) बाकीचा समूह त्यांच्या मागून येत होता. अचानक त्यांच्यासमोर एक प्रचंड मोठी आणि खोल दरी आली. तिचा उतारच इतका तीव्र होता की पुढे एक पाऊल टाकणं सुद्धा शक्य नव्हतं. सर्वात हिंमतवान लोकसुद्धा थांबले आणि त्यांनी नेत्याकडे पाहिलं. कपाळावर आठ्या आणून विचारात गुंग झालेल्या आणिमान खालीच असलेल्या त्या नेत्याने धाडसानेएक पाय पुढे टाकला.आपल्या काठीने जमिनीवर त्याच्या नेहमीच्याच सवयीनुसार आधी उजवीकडे आणि मग डावीकडे टकटक केली. बऱ्याच जणांना त्याचं हे वागणं अजूनच विशेष आणि प्रतिष्ठेचंवाटायचं. त्याने कधीच कोणाकडे पाहिलं नव्हतं किंवा काही बोलला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील रेषा कधीही बदलल्या नव्हत्या आणि तो आता त्या दरीच्या जवळ जात असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीतीनव्हती.जवळ असलेले सर्वात हिंमतवान पुरुषही मृत्यूच्या भीतीने कापू लागले तरी कोणाचीही त्या ज्ञानी नेत्याला थांबवण्याची हिंमत झाली नाही. अजून दोन पावलं टाकून तो दरीच्या अगदी कडेला आला होता. जिवाच्या भीतीने ते सगळे हादरून गेले, पुढे असलेले पुरुष तर त्याला खेचायला तयारच होते,जरी त्यामुळे त्यांच्या नियमांचा भंग झाला असता तरी. त्या नेत्याने अजून एक पाऊल टाकलं आणि तो दरीमध्ये दिसेनासा झाला. सगळीकडे गोंधळ,आरडाओरडा सुरू झाला. सर्व लोकांमध्ये भीती पसरली. काहीजण पुन्हा मागे जाऊ लागले.

– थांबा,बंधुंनो! कसली घाई आहे?तुम्ही तुमचा शब्द असा पाळणार आहात का?आपणन घाबरता या ज्ञानी माणसाच्या मागे गेलं पाहिजे, कारण त्याला तो काय करतोय हे माहीत आहे.तो काही स्वतःला इजा करून घ्यायला वेडा नाही आहे.कदाचित ही दरी म्हणजेच सर्वात मोठा आणि शेवटचा अडथळा असेल. कुणास ठाऊक, कदाचित याच्या पलीकडेदेवाने आपल्यासाठी अतिशयउत्तम आणि सुपीक अशी जमीन ठेवली असेल. चला पुढे! त्याग केल्याशिवायसहज तरकाहीही मिळत नाही! – वक्ता हे शब्द म्हणाला, त्याने दोन पावलं पुढे टाकली आणि तोही दरीमध्ये दिसेनासा झाला.

बाकीचे हिंमतवान लोकही त्याच्या मागोमाग गेले आणि मग सगळेच खाली जाऊ लागले. त्या खडकाळ दरीमध्ये ओरडण्याचा, कळवण्याचा, रडण्याचा, आपटण्याचा,कण्हण्याचा आवाज घुमू लागला. त्या ठिकाणाहून कोणीही जिवंत बाहेर येऊ शकत नाही असंच वाटत होतं, मग काहीही इजा न होता अगदी व्यवस्थित बाहेर येणं तर अशक्य होतं. पण मानवी जीव खूप हट्टी असतो. नेता यावेळी अगदी विलक्षण पद्धतीने नशीबवान ठरला, तो पडत असतानाचत्याला झुडपांना पकडून ठेवता आलं, त्यामुळे त्याला काही इजा झाली नाही. त्याने स्वतःला वर खेचून बाहेर येण्यात यश मिळवलं. खाली जेव्हा कळवळण्याचा, ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज घुमत होता, तेव्हा तो बाहेरयेऊनआधीसारखाचशांतपणे विचार करत बसला.गंभीर जखमा झालेले बरेच जण खूप रागावले, आणि त्याला शिव्याशाप देऊ लागले. पण तो काहीच बोलला नाही. जे लोक झुडूपं किंवा झाडांना पकडण्यात यशस्वी झाले होते ते पुन्हा बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. काहीजणांची डोकीफुटली होती, त्यांच्या चेहर्‍यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तिथेत्या नेत्याला सोडून कोणीचपूर्णपणे ठीक नव्हतं. वेदनेने कळवळत असतानाच,सर्वांची त्याच्याकडे पाहण्याची नजर बदलली. पण त्याने त्याची मान जराही वर केलीनाही,तोएखाद्या तपस्व्याप्रमाणे शांतचबसून राहिला.

काही काळ गेला आणि प्रवाशांची संख्या अजून कमी होत गेली. प्रत्येक दिवशी काहीतरी घडत होतं. काहीजण हा प्रवास सोडून पुन्हा मागे गेले.

सुरुवातीला असलेल्या प्रचंड संख्येमधून आता फक्त सुमारे वीस जण उरले होते. त्यांचे निस्तेज आणि मळलेले चेहरे भीती,आशंका,थकवा आणि भूक या सर्व भावना दर्शवत होते. पण कोणीही एक शब्दसुद्धा बोललं नाही.ते त्यांच्या नेत्याप्रमाणेच शांत राहिले आणि त्याच्या मागोमाग चालू लागले. आधी उत्साही असलेला वक्तासुद्धा आता नाराजीने मान हलवत होता. रस्ता अत्यंत कठीण होता.

त्यांची संख्या प्रत्येक दिवशी कमी होत गेली आणि शेवटी दहावर आली. नैराश्याने भरलेल्या चेहऱ्यांनी ते एकमेकांशी बोलताना फक्त तक्रारीच करत होते.

ते पूर्णपणे अपंग झाले होते. त्यांच्यापैकी काहीजण हातातकुबड्या घेऊन चालत होते. काहीजणांनी त्यांचे हात गळ्याभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये अडकवले होते. त्यांच्या हातांवर जागोजागी पट्ट्या बांधल्या होत्या.त्यांची अजूनत्रास सहन करण्याची तयारी असली तरी ते करू शकत नव्हते, कारण त्यांच्या शरीरावर आता जवळजवळ कुठेच नवीन जखमांसाठी जागा उरली नव्हती.

त्यांच्यापैकी सर्वात शूर आणि ताकदवानलोकांचासुद्धा आत्मविश्वास कमी झालाहोता. तरीही ते संघर्ष करत चालत होते, बरेच प्रयत्न करून,शिव्याशाप देत वेदनेने कळवळत मागून जात होते. अजून काय करू शकणार होतेते?इतकं सहन केल्यानंतर हा प्रवास सोडून परत मागे जाणं शक्य नव्हतं.

संध्याकाळ झाली!कुबड्या घेऊन लंगडत चालत असताना त्यांना अचानक दिसलं की नेता त्यांच्यासमोर नव्हता, अजून एक पाऊलपुढे, आणि ते सगळे पुन्हा एका दरीमध्ये घसरून पडले.

– ओह,माझा पाय! माझा हात! – कण्हण्याचा, रडण्याचा, ओरडण्याचा आवाजपुन्हा घुमू लागला.एका बारीकशाआवाजाने त्या ज्ञानी नेत्याला शिव्या दिल्या पण तो आवाजलगेच शांत झाला.

जेव्हा सूर्य वर आला, तेव्हा नेता समोरच बसला होता,अगदी तसाच जसातो त्यांना पहिल्या दिवशी दिसला होता. त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नव्हता.

तो वक्ता दरीतून बाहेर आला, त्याच्यामागोमाग अजून दोन जण आले.हातापायांना जखमा झालेले, रक्ताने माखलेले तेतीन प्रवासी मागे वळून अजून कितीजण उरले आहेत ते पाहू लागले,पण आता फक्त तेच राहिले होते.त्यांचं हृदयनैराश्याने आणि मृत्युच्या भीतीने पिळवटून गेलं. हा प्रदेश अनोळखी होता,खडकाळ,डोंगर-दर्‍या असलेला – इथे कुठेच वाट नव्हती. दोन दिवसांपूर्वी ते एका पायवाटेजवळ आले होते, पण त्यांनी ती वाट सोडून दिली. त्यांचा नेता त्यांना या रस्त्याने घेऊन आलाहोता. ते या प्रवासामध्ये मृत्यू पावलेल्या अनेक मित्रांचा आणि नातेवाईकांचा विचार करू लागले.वेदनेपेक्षा भयंकर असलेल्या दुःखाने त्यांच्यावर मात केली. त्यांना त्यांचा स्वतःचा विनाश स्वतःच्या डोळ्यांनी दिसला होता.

तो वक्ता नेत्याच्या जवळ गेला आणि थकलेल्याव वेदनेने थरथरणाऱ्या आवाजात बोलू लागला.

– आपण आता कुठे जात आहोत?

नेता शांतच होता.

– तुम्ही आम्हाला कुठे नेत आहात आणि तुम्ही आम्हाला कुठे आणलं आहे? आम्ही स्वतःला आणि आमच्या कुटुंबांना तुमच्या हातात सोपवलं होतं. आमची घरं आणि आमच्या पूर्वजांच्या आठवणींना मागेच सोडून तुमच्या सोबत आलो होतो, जेणेकरून आम्ही त्या नापिक जमिनीमध्ये मरून जाणार नाही. पण तुम्ही आमची अवस्था अजूनच दयनीय केली आहे. तुमच्या मागे दोनशे कुटुंबं होती आणि आता पहा किती जण उरले आहेत ते!

– म्हणजे सगळेजण इथे नाही आहेत?नेता मान वर न उचलता कुजबुजला.

-तुम्ही हा प्रश्न विचारू तरी कसा शकता?मान वर करा आणि पाहा!या दुर्दैवी प्रवासामध्ये आमच्यापैकी कितीजण उरले आहेत ते मोजा! आणि आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत हे पहा! अशाप्रकारे अपंग होण्यापेक्षा,आम्ही मारून गेलो असतो तर बरं झालं असतं.

– मी तुमच्याकडे पाहू शकत नाही!

– का नाही?

– मी आंधळा आहे.

एक दीर्घ शांतता.

– तुमची दृष्टीया प्रवासामध्ये गेली का?

– मी जन्मापासूनच आंधळा आहे!

तिघांनीही प्रचंड दुःखामध्ये आपलं डोकं पकडलं.

थंडगार वारा भयंकरपणे त्या खडकांतून वाहू लागला. त्याबरोबर काही सुकलेली पानं वाहत आली. टेकडीवर धुकंजमायला सुरुवात झाली आणि त्या थंड, धुरकट हवेतून गिधाडांचे पंख फिरू लागले.अगदी दुर्दैवी असाएकचीत्कार घुमला. सूर्य ढगांच्या पलीकडे लपला होता,जे वेगाने दूर आणि दूर निघून जात होते.

तिघांनीही एकमेकांकडे अतिशय भीतीने पाहिलं.

– आता आपण कुठे जायचं?– एकानेघाबरत विचारलं.

– माहीत नाही!

 

बेलग्रेड मध्ये, १९०१.
रदोये डोमानोविच प्रकल्पासाठी अनुवादक अभिषेक शेट्ये, २०२०.

नेता (२/३)

(मागील पान)

दुसर्‍या दिवशी, ज्यांच्यामध्ये दूरच्या प्रवासावर जाण्याचं धैर्य होतं असे लोक एकत्र आले. दोनशेहून अधिक कुटुंबं ठरवलेल्या ठिकाणी एकत्र जमली. फक्त मोजकेच जण जुन्या वसाहतीची देखभाल करण्यासाठी मागे थांबले.

या दुःखी लोकांच्या मोठ्या समूहाची अवस्था खूपच करुणाजनक होती. दुर्दैवाने त्यांना तो प्रदेश सोडून जावं लागत होतं जिथे ते लहानाचे मोठे झाले होते, जिथे त्यांच्या पूर्वजांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांचे चेहरे निस्तेज, थकलेले आणि उन्हाने रापलेले दिसत होते. कित्येक वर्षांच्या जीवतोड मेहनतीचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येत होता. त्यातून त्यांच्या दुःखाची आणि नैराश्याची कल्पना येत होती. पण याच क्षणी त्यांच्यात आशेचा एक किरणही दिसत होता – त्यात घराची आठवण सुद्धा होती. एका वृद्ध रहिवाशाच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळला आणि पुढे असलेल्या कठीण भविष्याच्या विचारानेच त्याने एक उसासा टाकला. त्याला चांगली जागा शोधण्यापेक्षा काही काळ इथेच राहून या दगडांमध्ये मरून जाणं चालणार होतं. बऱ्याच स्त्रिया शोकाकुल होऊन त्यांच्या मृत सोयऱ्यांच्या अंतिम स्थळाचा निरोप घेत होत्या.

पुरुष शूर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत होते आणि ओरडत होते, – तुम्हाला या शापित भागातील या झोपड्यांमध्ये राहून भुकेने मरून जायचं आहे का? – खरंतर त्यांना या दुर्दैवी भागातील आणि या गरीब झोपड्यांतील चांगल्या त्या सर्व गोष्टी आपल्या सोबत घेऊन जाणं आवडलं असतं, पण ते शक्य नव्हतं.

लोकांच्या समूहात असतो तसाच नेहमीचा गोंधळ इथे सुद्धा सुरूच होता. पुरुष आणि स्त्रिया दोघेही बेचैन होते. लहान मुलं त्यांच्या आयांच्या पाठीवरील पाळण्यांमध्ये केकाटत होती. त्यांचे प्राणी सुद्धा काहीसे अस्वस्थ होते. गुरं जास्त नव्हतीच, एखाददुसरं वासरू होतं. एक बारीकसा केसाळ घोडा होता ज्याचं डोकं मोठं आणि पाय जाडे होते. त्याच्यावर सर्वांनी जुन्या चादरी, पिशव्या आणि दोन गाठोडी टाकली होती. इतक्या वजनामुळे त्या प्राण्याचा तोल जात होता. तरीही तो ताठ उभा राहून वेळोवेळी खिंकाळत सुद्धा होता. बाकीच्यांनी गाढवांवर सामान लादलं होतं, मुलं कुत्र्यांना पकडून ठेवत होती. बोलणं, ओरडणं, शिव्या देणं, रडणं, भुंकणं, खिंकाळणं – सर्वकाही वाढत होतं. गाढव सुद्धा काहीवेळा ओरडलं. पण त्या नेत्याने एकही शब्द काढला नाही, जणू काही त्याचा या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता. खरंच एक ज्ञानी मनुष्य!

तो त्याचं डोकं खाली ठेवून शांतपणे विचारात मग्न होता. एक दोन वेळा बाजूला थुंकला, इतकंच. पण त्याच्या या विलक्षण वागण्यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली की सर्वजण फक्त त्याच्यासाठी अग्नी आणि पाण्यातून जायला तयार झाले असते. खालील संवाद तिथे ऐकू येत होते:

– असा माणूस आपल्याला भेटलाय याचा आनंद झाला पाहिजे. असं बोलू नये, पण जर त्याच्याशिवाय आपण निघालो असतो तर पुढे जाऊन मरून गेलो असतो. तो खरा बुद्धिमान आहे, मी सांगतोय ना! तो किती शांत आहे, अजून एक शब्दही बोलला नाहीय! – एक जण नेत्याकडे सन्मानाने आणि अभिमानाने पाहत म्हणाला.

– तो बोलेल तरी काय? जो कोणी जास्त बोलत राहतो तो खूप कमी विचार करतो. तो ज्ञानी आहे, हे तर नक्कीच निश्चित  आहे! तो फक्त विचार करतो पण काही बोलत नाही, – दुसऱ्याने दुजोरा दिला, आणि तो ही नेत्याकडे आश्चर्याने पाहू लागला.

– इतक्या जास्त लोकांचं नेतृत्व करणं सोपं नाही आहे. त्याला सतत विचार करत राहावं लागतंय करण त्याच्या हातात मोठी जबाबदारी आहे, – पहिला पुन्हा म्हणाला.

निघण्याची वेळ झाली. ते थोडावेळ थांबून अजून कोणी त्यांच्यासोबत येत आहे का ते पाहू लागले, पण कोणी न आल्यामुळे थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता.

– आता निघालं पाहिजे ना? – त्यांनी नेत्याला विचारलं.

तो काहीही न बोलता उभा राहिला.सर्वात हिंमतवान पुरुष काही बरं-वाईट झालं तर त्याच्या जवळ असावं म्हणून लगेच त्याच्या भोवती जमले.

कपाळावर आठ्या आणि मान खाली असलेला तो नेता, आपली काठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तिप्रमाणे हलवत, काही पावलं पुढे गेला.  सर्व लोकसुद्धा त्याच्या मागोमाग चालू लागले आणि ओरडू लागले, „आमच्या नेत्याचा विजय असो!“ तो अजून थोडा पुढे गेला आणि गावाच्या सभागृहासमोरील कुंपणावर जाऊन धकडला. तिथे अर्थातच तो थांबला, त्यामुळे बाकीचे लोक पण थांबले. नेता थोडासा मागे आला आणि आपली काठी काहीवेळ त्या कुंपणावर आपटू लागला.

– आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे?-लोकांनी विचारलं.

तो काहीच म्हणाला नाही.

– त्यांना काय विचारतोस? हे कुंपण तोडून टाकलं पाहिजे! हेच आता केलं पाहिजे! तू बघितलंस ना त्यांनी आपल्याला त्यांच्या काठीने सांगितलं काय करायचं ते? – नेत्याच्या जवळ उभे असलेले लोक म्हणाले. – पण प्रवेशद्वार तिथे आहे! – लहान मुलं ओरडू लागली आणि त्यांच्या विरुद्धदिशेला असलेलं प्रवेशद्वार दाखवू लागली.

– श्श! शांत रहा, मुलांनो.

– देवा, मदत कर, हे काय चाललंय? – काही स्त्रिया प्रार्थना करू लागल्या.

– काही बोलू नका. त्यांना माहितीय काय करायचं ते. हे कुंपण तोडून टाका.

क्षणार्धात ते कुंपण मोडून टाकण्यात आलं जसं काही ते तिथे नव्हतंच.

ते कुंपणाच्या पलीकडे आले.

ते जवळजवळ शंभर पावलं चालले असतील इतक्यात नेता एका काटेरी झुडुपावर आदळला आणि थांबला. मोठ्या प्रयत्नाने त्याने स्वतःला तिथून बाहेर काढलं आणि आपली काठी सर्व दिशांना जमिनीवर आपटू लागला. कोणीही हललं नाही.

– आता काय झालं आहे? – मागे असणारे ओरडू लागले.

– हे काटेरी झुडूप कापून टाका! – नेत्याच्या जवळ असणारे लोक म्हणाले.

– पण यावं झुडुपाच्या बाजूनेही वाट आहे! ती बघा तिथे! – लहान मुलं आणि मागे असलेले बरेच लोक सांगू लागले.

– तिथे वाट आहे! तिथे वाट आहे! – नेत्याच्या बाजूला असणारे रागाने वेडावून दाखवू लागले. – आपणच रस्ता सांगू लागलो त्यांना आपल्याला हवं तिथे कसं नेता येईल? प्रत्येकजण इथे आज्ञा देऊ शकत नाही. त्यांनाच सर्वात उत्तम आणि थेट रस्ता माहीत आहे. हे काटेरी झुडूप कापून टाका!

ते झुडुप काढून वाट तयार करण्यासाठी पुढे सरसावले.

– देवा, – एक जण ओरडला ज्याचा हात त्या काट्यांमध्ये अडकून गेला होता आणि अजून एक ज्याच्या चेहऱ्यावर त्या झुडुपाची फांदी लागली.

– बंधूंनो, मेहनत न करता काहीही मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी थोडे परिश्रम तर करावे लागतील. – समूहातील सर्वात हिंमतवान लोक म्हणाले.

बऱ्याच प्रयत्नांनी ते झुडुपातून बाहेर आले आणि पुढे निघाले.

अजून काही अंतर पुढे भटकत गेल्यावर त्यांच्यासमोर वाटेत काही लाकडी ओंडके आले. हे सुद्धा उचलून बाजूला टाकण्यात आले. मग ते पुढे गेले.

पहिल्याच दिवशी त्यांनी खूप कमी अंतर पार केलं होतं कारण त्यांना अशाच प्रकारचे अनेक अडथळे दूर करावे लागले होते. आणि त्यांच्याकडे अन्न सुद्धा खूप कमी होतं. कारण काहींनी फक्त सुके पाव आणि थोडं चीज आणलं होतं आणि काहींनी तर आपली भूक भागवण्यासाठी फक्त पाव आणले होते. काहींकडे काहीच नव्हतं. सुदैवाने उन्हाळा चालू होता म्हणून त्यांना मध्ये मध्ये काही फळांची झाडं मिळत होती.

म्हणून पहिल्याच दिवशी जरी त्यांनी खूप कमी अंतर पार केलं होतं तरी त्यांना खूप जास्त थकवा जाणवला. काही मोठे धोके आले नाहीत आणि अपघातही झाले नाहीत. इतक्या मोठ्या प्रवासामध्ये पुढील गोष्टी खूप सामान्य म्हणूनच गणल्या जातील: एका स्त्रीच्या डाव्या डोळ्यामध्ये काटा रुतला ज्यावर तिने ओला कपडा बांधून ठेवला; एक लहान मूल रडत असताना लाकडी ओंडक्यावर अडकून पडलं; एक वृद्ध मनुष्य ब्लॅकबेरीच्या झुडुपावरून घसरला आणि त्याचा पाय मुरगळला; त्यावर कांदा चोळल्यानंतर तो हिंमतीने वेदना सहन करत, आपल्या काठीचा आधार घेत, अभिमानाने नेत्याच्या पाठीमागून चालू लागला. (खरं सांगायचं तर, बरेच जण म्हणाले की तो वृद्ध मुरगळलेल्या पायाबद्दल खोटं बोलत होता, तो फक्त ढोंग करत होता जेणेकरून त्याला मागे जाता येईल.) काही काळाने, हातात काटे रुतले नाहीयत किंवा चेहरा घासला गेला नाहीय असे फार कमी लोक राहिले. पुरुष हे सर्व काही अभिमानाने सहन करत होते तर स्त्रिया त्यांच्या निघण्याच्या वेळेपासूनच शिव्याशाप देत होत्या. मुलं अर्थातच रडत होती कारण त्यांना या परिश्रमाचं पुढे जाऊन चांगलं फळ मिळणार आहे हे समजत नव्हतं.

पण सर्वांना याचा आनंद होता की नेत्याला काहीच झालं नव्हतं. खरं सांगायचं झालं तर, सगळेच त्याच्या रक्षणासाठी सावध होते, पण तरीही, तो स्वतः सुद्धा नशीबवान होता. पहिल्या रात्री थांबल्यावर सर्वांनी प्रार्थना केली व दिवसाचा प्रवास यशस्वी करून दिल्याबद्दल आणि नेत्याला काहीही इजा न पोहोचवल्याबद्दल देवाचे आभार मानले. नेत्याजवळच्या हिंमतवान पुरुषांपैकी एक जण बोलू लागला. त्याच्या चेहऱ्यावर ब्लॅकबेरीच्या झुडुपामुळे खरचटलं होतं पण त्याने त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.

– बंधूंनो, – त्याने सुरुवात केली.- देवाच्या कृपेमुळे आपण एका दिवसाचा प्रवास यशस्वीरित्या पार पाडला आहे. रस्ता सोपा नाही आहे, पण तरीही आपल्याला पुढे जावं लागेल कारण हा कठीण रस्ताच आपल्याला सुखाच्या दिशेने नेणार आहे. देव आपल्या नेत्याचं रक्षण करो जेणेकरून ते असंच यशस्वीपणे आपलं नेतृत्व करत राहतील.

– जर असंच सुरू राहिलं तर उद्या माझा दुसरा डोळा सुद्धा जाईल! – एक स्त्री काहीशा रागात म्हणाली.

– ओह, माझा पाय! – तो वृद्ध पुरुष म्हणाला, ज्याला त्या स्त्रीच्या बोलण्याने उत्तेजन मिळालं.

लहान मुलं रडत होती, आणि त्यांच्या आया भाषण चालू असल्याने त्यांना शांत बसवत होत्या.

– होय, तुझा दुसरा डोळा सुद्धा जाईल, – वक्ता रागाने भडकून म्हणाला,- आणि जाऊ देत तुझे दोन्ही डोळे! अशा महान कार्यासाठी एखाद्या स्त्रीचे डोळे गेले तर काही नाही होणार. जरा विचार करा! तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य पाहिलं पाहिजे. आपल्यातले अर्धे जण या प्रवासात मेले तरी चालतील! काही फरक पडणार नाही! एका डोळ्याचं काय घेऊन बसलात? आपली काळजी घेणारं आणि आपल्याला सौख्याच्या दिशेने नेणारं कोणीतरी इथे असताना डोळे हवेतच कशाला?आपण काय फक्त तुझ्या एका डोळ्यासाठी आणि या म्हाताऱ्याच्या पायासाठी आपलं ध्येय विसरून जायचं?

– तो खोटं बोलतोय! तो म्हातारा खोटं बोलतोय! त्याला परत मागे जायचं आहे म्हणून तो ढोंग करतोय. – चहुबाजूंनी आवाज येऊ लागले.

– बंधूंनो, ज्या कोणाला पुढे जाण्याची इच्छा नसेल, – वक्ता पुन्हा बोलू लागला, – तो तक्रार करत बसण्यापेक्षा परत जाऊ शकतो. माझ्याबद्दल विचाराल तर, मी या ज्ञानी नेत्याच्या मागून तोपर्यंत जात राहीन जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण उरले आहेत!

– आम्हीही जाऊ! आम्हीही जिवंत आहोत तोवर त्यांच्या मागे जाऊ!

तो नेता शांतच होता.

प्रत्येक जण त्याच्याकडे पाहून कुजबुजू लागला:

– तो विचारांत मग्न झाला आहे!

– ज्ञानी मनुष्य!

– त्याच्या कपाळाकडे पाहा!

– सतत आठ्या पडलेल्या असतात!

– खूप गंभीर!

– तो शूर आहे! त्याच्याकडे बघूनच समजतं.

– बरोबर बोलतोयस तू! कुंपणं, ओंडके, झुडूपं – तो सगळ्यातून मार्ग काढतो. तो फक्त शांतपणे त्याची काठी आपटतो, काहीही न बोलता, आणि आपल्याला समजून घ्यावं लागतं तो काय विचार करत असेल.

(पुढील पान)

नेता (१/३)

– ­बंधूंनो आणि मित्रांनो, मी तुम्हा सर्वांची भाषणं ऐकली आहेत, आणि तुम्ही आता माझं ऐकावं अशी मी विनंती करतो. जोवर आपण या ओसाड प्रदेशातच राहत आहोत तोवर आपल्या या सर्व चर्चा आणि वादविवाद व्यर्थ आहेत. या रेताड जमिनीमध्ये आणि या खडकांमध्ये जेव्हा पाऊस होता त्यावेळीही काही पिकू शकलं नाही, तर आताच्या, सर्वात तीव्र असलेल्या या दुष्काळात इथे काहीही पिकणं अगदीच अशक्य आहे. आपण किती वेळ असे एकत्र येऊन आपली रडगाणी गाणार आहोत? गुरं अन्नाशिवाय मरत आहेत, आणि लवकरच आपल्याला आणि आपल्या मुलांनाही खायला मिळणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा उपाय शोधला पाहिजे जो उत्तम आणि अमलात आणण्याजोगा असेल. मला वाटतं आपण ही उजाड जमीन सोडून बाहेरच्या जगात गेलं पाहिजे जिथे चांगली आणिसुपीक माती असेल, कारण अशा अवस्थेत तर आपण फार काळ जगू शकणार नाही.

अशाप्रकारे एका ओसाड भागातला एक रहिवासी एका सभेमध्ये अगदी थकलेल्या आवाजात बोलला होता. कधी आणि कुठे हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा की असं कुठल्यातरी प्रदेशात फार काळापूर्वी घडलं होतं, आणि तेच महत्त्वाचं आहे. खरंसांगायचं तर, एकदा मला वाटू लागलं की ही गोष्ट मीच तर तयार केलेली नाही ना, पण हळूहळू मी स्वतःला त्या विचित्र विचारातून मुक्त केलं. आता माझा ठाम विश्वास आहे की मी या कधीतरी कुठेतरी प्रत्यक्षात होऊन गेलेल्या घटनेचा इथे संदर्भ देऊ शकतो जी मी अजिबात माझ्या कल्पनेतून तयार केलेली नाही.

आपले हात खाली ठेवून, खिन्न, गोंधळलेल्या नजरेने पाहत,उदास व निस्तेज चेहर्‍याने समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहर्‍यावर या विद्वत्तापूर्ण शब्दांमुळे थोडी तरतरी दिसू लागली. सगळेजण लगेच कल्पनेत हरवून गेले की ते एका जादुई, स्वर्गीय प्रदेशामध्ये आहेत जिथे जीवतोड मेहनतीचं फळ म्हणून खूप जास्त पीक मिळत आहे.

– ­बरोबर आहे! बरोबर आहे! – सर्व बाजूंनी थकलेल्या आवाजात कुजबूज सुरू झाली.

– ही जागा कुठे जवळ आहे का? – एका कोपर्‍यातून हळूच आवाजात प्रश्न विचारला गेला.

–बंधूंनो! – अजून एकजण काहीशा खणखणीत आवाजात बोलू लागला. – आपण लगेचच हा सल्ला अंमलात आणला पाहिजे कारण आपण असे फार काळ जगू शकणार नाही. आपण खूप परिश्रम करून स्वतःला त्रास करून घेतला, तरीही काही फायदा झाला नाही. आपण पेरणी केली ज्यातून आपल्याला काहीतरी खायला मिळू शकलं असतं पण पूर आला आणि मातीसकट सर्वकाही वाहून घेऊन गेला, ज्यामुळे आता फक्त हे खडक उरले आहेत. आपण सकाळ संध्याकाळ परिश्रम करूनही तहानलेले आणि भुकेलेलेच आहोत, विवस्त्र आणि अनवाणीच आहोत. तरीही आपण इथेच राहायचं का? आपल्याला इथून बाहेर पडून चांगली सुपीक जमीन शोधली पाहिजे जिथे आपल्या परिश्रमांचं फळ म्हणून आपल्याला भरभरून पीक मिळेल.

– चला! लवकर चला! कारण ही जागा आता राहण्यालायक राहिली नाही आहे.

कुजबूज वाढू लागली, आणि प्रत्येकजण चालू लागला,आपण कुठे जातोय हे न पाहताच.

– थांबा, बंधूंनो! कुठे जाताय तुम्ही?– पहिला वक्ता पुन्हा बोलू लागला. – हो, बाहेर जायचंच आहे, पण असं जायचं नाहीय. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण कुठे जातोय. नाहीतर आपण यापेक्षाही कठीण परिस्थितीमध्ये अडकू. मला वाटतं आपण एक नेता निवडला पाहिजे, ज्याचं सर्वांना ऐकावं लागेल आणि जो आपल्याला सर्वात उत्तम आणि अचूक मार्ग दाखवू शकेल.

– हो, निवडा! लगेच कोणालातरी निवडा! – चहूबाजूंनी आवाज येऊ लागला.

पण यावेळी आवाज वाढू लागला, गोंधळ झाला. प्रत्येकजण बोलत होता आणि कोणीच ऐकत किंवा ऐकू शकत नव्हतं. ते वेगवेगळ्या गटांत विभाजित होऊ लागले, प्रत्येकजण स्वतःशीच बोलत होता आणि नंतर हे गटसुद्धा विभागले गेले. आता दोघादोघांच्या जोड्यांमधून लोक बोलू लागले, आपलं म्हणणं पटवून देऊ लागले, एकमेकांच्या हातांना धरून खेचू लागले, आणि आपल्या हातांनी दुसर्‍यांना शांत राहण्याच्या खुणा करू लागले. सर्वजण एकत्र आले, अजूनही बोलत.

– बंधूंनो! – अचानक एक खणखणीत आवाज घुमला, ज्यामुळे बाकीचे कुजबुजणारे, निस्तेज आवाज विरून गेले. – आपल्याला अशाप्रकारे काहीच ठरवता येणार नाही. प्रत्येकजण बोलतो आहे आणि कोणीच ऐकत नाहीय. आपल्याला एक नेता निवडायचा आहे. आपल्यातून आपण कोणाला निवडू शकतो? आपल्यातल्या कोणी इतका प्रवास केला आहे ज्याला रस्ते माहीत असतील? आपण सगळे एकमेकांना चांगले ओळखतो, पण तरीही मी स्वतःला आणि माझ्या मुलांना इथल्या कोणाच्याही नेतृत्वाखाली ठेवू शकत नाही. त्यापेक्षा, मला सांगा आज सकाळपासून त्या रस्त्याच्या कडेला सावलीत बसलेल्या त्या प्रवाशाला कोण ओळखतं?

शांतता पसरली. सगळे त्या अनोळखी व्यक्तीकडे वळले आणि त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळू लागले. मध्यमवयीन, खिन्न चेहरा, जो वाढलेल्या केस आणि दाढीमुळे नीट दिसतही नव्हता असा तो प्रवासी तसाच शांत बसून राहिला, विचारात हरवून जाऊन मध्येच आपली मोठी काठी जमिनीवर आपटत होता.

– काल मी त्याच माणसाला एका लहान मुलाबरोबर पाहिलं होतं. त्यांनी एकमेकांचा हात पकडला होता आणि रस्त्यावरून चालत जात होते. आणि काल रात्री तो मुलगा गाव सोडून गेला पण हा माणूस इथेच थांबला.

– बंधू, या क्षुल्लक गोष्टींवर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीय. तो जो कोणी असेल तो फार दूरवरून इथे आला आहे कारण आपण कोणीच त्याला आधी पाहिलं नाहीय. आणि त्याला इथून जाण्याचा सर्वात अचूक रस्ता नक्कीच माहीत असेल. मला असं जाणवतंय की तो खूप ज्ञानी मनुष्य आहे कारण तो शांतपणे तिथे बसून विचार करतो आहे. दुसरं कोणी असतं तर इतक्यात दहा वेळा त्याने आपल्या बोलण्यात व्यत्यय आणला असता किंवा इतक्यात आपल्यातल्या कोणा एकाशी बोलूसुद्धा लागला असता. पण तो बराच वेळ तिथे एकटाच बसून आहे आणि काहीच बोलत नाहीय.

– तो शांतपणे बसला आहे म्हणजे अर्थातचतोगहन विचार करतो आहे. तो नक्कीच एक ज्ञानी मनुष्य असला पाहिजे. – बाकीच्यांनी दुजोरा दिला आणि पुन्हा त्या माणसाचं निरीक्षण करू लागले. प्रत्येकाला त्याच्यामध्ये तो खूप बुद्धिमान असल्याची खात्री करून देणारा काहीतरी वेगळा गुण दिसत होता.

बोलण्यात अजून जास्त वेळ घालवायचा नव्हता, म्हणून शेवटी सर्वांनी ठरवलं की या प्रवाशालाच जाऊन विचारावं, ज्याला देवाने त्यांना नवी सुपीक जमीन शोधण्यात मदत व्हावी म्हणून पाठवलं आहे असं त्यांना वाटत होतं. तोच त्यांचा नेता बनला पाहिजे आणि ते काहीही प्रश्न न विचारता म्हणणं ऐकतील.

त्यांनी त्यांच्यातल्या दहा जणांना निवडलं जे त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्यांचा निर्णय सांगणार होते. त्याला त्यांच्यावर आलेल्या दयनीय परिस्थितीची माहिती करून देणार होते आणि त्यांचा नेताबनण्याची विनंती करणार होते.

म्हणून दहा जण पुढे गेले आणि त्याच्यासमोर नम्रतापूर्वक झुकले. त्यांच्यातला एकजण तिथली नापीक जमीन, दुष्काळी वर्षं आणि त्यांच्या करूणाजनक परिस्थितीबद्दल बोलू लागला. त्याने त्याचं बोलणं असं पूर्ण केलं:

– या परिस्थितीमुळे आम्हाला आमचं घर आणि आमची जमीन सोडून बाहेरच्या जगात चांगल्या जमिनीच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. यावेळी जेव्हा आम्ही एका निर्णयापर्यंत पोहोचलो तेव्हा देवानेच आमच्यावर कृपा केली असं दिसतंय. कारण त्याने तुम्हाला पाठवलंय. एका ज्ञानी आणि बुद्धिमान मनुष्याला. जो आमचं नेतृत्व करून आमची या संकटातून सुटका करेल. इथल्या सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही तुम्हाला आमचा नेता बनण्याची विनंती करतो. तुम्ही जिथेही जाल, आम्ही सोबत येऊ. तुम्हाला रस्ते माहीत आहेत, आणि नक्कीच एखाद्या चांगल्या प्रदेशात तुमचा जन्म झाला असेल. आम्ही तुमचं नीट ऐकू आणि तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू. तर हे ज्ञानी मनुष्या, तुम्ही इतक्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार आहात का? तुम्ही आमचा नेता बनाल का?

या विनंतीपूर्ण भाषणामध्ये त्या ज्ञानी माणसाने एकदाही त्याचं डोकं वर उचललं नाही. संपूर्ण वेळ तो तसाच बसला होता जसं त्यांनी त्याला पाहिलं होतं. त्याचं डोकं खाली झुकलं होतं, कपाळावर आठ्या होत्या, आणि तो काहीच बोलला नाही. तो फक्त वेळोवेळी त्याची काठी जमिनीवर आपटत विचार करत होता. जेव्हा हे भाषण संपलं तेव्हा तो जराही न हलता तुटकपणे म्हणाला:

– हो.

– मग आम्ही तुमच्यासोबत येऊन नवीन जागा शोधू शकतो का?

– हो. – मान वर न करता त्याने उत्तर दिलं.

सर्वांमध्ये उत्साह पसरला सगळे त्याचे आभार मानू लागले, पण तो मनुष्य त्यांच्याशी काहीही बोलला नाही.

ते दहा जण परत येऊन सर्वांना ही चांगली बातमी सांगू लागले आणि म्हणाले की आताच त्यांना या मनुष्याच्या महान बुद्धिमत्तेचा साक्षात्कार झाला.

– तो त्याच्या जागेवरून हलला सुद्धा नाही किंवा आपण कोणाशी बोलतोय हेही त्याने पाहिलं नाही. तो शांत बसून विचारच करत राहिला. आम्ही इतकं बोललो आणि त्याचं कौतुक केलं पण तो फक्त दोन शब्दच बोलला.

– महान मनुष्य! विलक्षण बुद्धिमत्ता! – सर्वजण आनंदाने ओरडू लागले आणि म्हणू लागले की प्रत्यक्ष देवानेच त्यांना वाचवण्यासाठी या महान मनुष्याला स्वर्गातून या प्रदेशात पाठवलं आहे. सर्वांना खात्री झाली की जगातील कोणत्याही गोष्टीमुळे मानसिक शांती भंग होऊ न देणार्‍या अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली त्यांना नक्कीच यश मिळेल. आणि त्यांनी दुसर्‍याच दिवशी पहाटे त्या प्रदेशातून निघण्याचा निर्णय घेतला.

(पुढील पान)

नेता (१/३)

– दाजु-भाइहरू र साथीहरू, मैले तपाईंको सबै भाषणहरू सुनें, त्यसैले अब मेरो पनि सुन्न आग्रह गर्छु। हाम्रा सबै विचार-विमर्श र कुराकानीहरूको कुनै महत्त्व हुँदैन जबसम्म हामी यस बाँझो क्षेत्रमा रहन्छौं। वर्षाको वर्ष भए पनि यस बलौटे माटोमा र यी ढुङ्गाहरूमा केहि पनि उम्रन सकेको छैन, यस खडेरीमा एक्लै छोडिदेओ जुन हामी मध्ये कसैले पनि पहिले कहिल्यै देखेका थिएनौं। कहिलेसम्म हामी एसरी एक साथ भेला हुने र व्यर्थ कुरा गर्ने? गाईवस्तुहरू खानेकुरा बिना मरिरहेका छन्, र धेरै चाँडै हामी र हाम्रा बच्चाहरूलाई पनि भोकमरी लाग्नेछ। हामीले अर्को समाधान खोज्नु पर्छ जुन राम्रो र अधिक समझदार छ। मलाई लाग्छ यो सुक्खा भूमि छोड्नु उत्तम हुनेछ र संसारमा राम्रो र अधिक उर्वर माटो पत्ता लगाउन सुरु गर्नु पर्छ किनकि हामी एसरी लामो समयसम्म बाँच्न सक्दैनौं।

यसैले केही बांझो प्रान्तका बासिन्दाहरूले सभामा थकित आवाजमा एक पटक बोले। मलाई लाग्छ, कहाँ र कहिले त्यो तपाईं वा मलाई मतलब छैन। मलाई विश्वास गर्नु महत्त्वपूर्ण एस कारण छ कि यो धेरै पहिले कतै भएको थियो र यो पर्याप्त छ। इमान्दार हुनुपर्दा, एक समय मैले सोचे कि मैले यो सम्पूर्ण कथा आविष्कार गरें, तर अलि-अलि गर्दै मैले आफूलाई यस नराम्रो भ्रमबाट मुक्त गरें। अब म पूर्ण रूपमा विश्वास गर्दछु कि वास्तवमै के भयो र कहाँ र कतै घटेको हुनुपर्दछ र मैले कुनै पनि हालतमा यसलाई बनाएको छैन भनेर बताउन जाँदैछु।

श्रोताहरू फिक्का, थकित अनुहार र खाली, चिन्ताजनक, लगभग अबुझ हेराइ, आफ्नो बेल्ट मुनि उनीहरूका हातहरू, यी बुद्धिमानी शब्दहरूमा जीवित थिए जस्तो देखिन्थ्यो। प्रत्येकले कल्पना गरिसकेका थिए कि त्यो कुनै किसिमको जादुइ, स्वर्गिय देश हो जहाँ परिस्रमको इनाम प्रशस्त बालीनाली हुनेछ।

– ऊ सही छ! ऊ सही छ! – सबै तिरबाट थकित फुसफुसे आवाज आयो।

– के त्यो ठाउँ न न…जि…जि…क छ? – एक लामो आवाजमा गन गन गरेको आवाज कुनाबाट सुनियो।

– दाजुभाइहरू! – अर्को केही अलि बलियो आवाजको साथ शुरू भयो। – हामीले यस सल्लाहलाई तुरून्त पालना गर्नैपर्दछ किनकि हामी अब उप्रान्त यसरी अगाडि जान सक्दैनौं। हामीले परिश्रम गरेका छौं र आफैंलाई तनावमा पारेका छौं, तर सबै व्यर्थ गएका छन। हामीले बिउ रोपेका छौं जुन खानेकुराका लागि प्रयोग गर्न सकिन्थ्यो, तर बाढी आयो र बिउ र माटोलाई पानीले धोईदियो र केवल चट्टान मात्र बाँकी रह्यो। के हामी यहाँ सदाका लागि बस्ने र बिहान देखी साँझ सम्म मेहेनत गरेर भोकै, प्यासै, नाङगै र खाली खुट्टा बस्ने? हा हामीले अब यो भन्दा राम्रो र मलिलो मातो खोज्नु पर्छ जहाँ परिस्रम गरे पछी प्रसस्त बालीनानी उत्पादन होस्।

– जाऔं! हामी तुरुन्तै जाऔं किनकि यो ठाउँ अब बस्न योग्य छैन!

फुसफुके आवाज आयो, र सबै आफू कहाँ जाँदैछु भन्ने थाहा नभएरै हिंड्न थाले।

– रोक्नुहोस् दाजुभाइहरु! तपाईंहरु कहाँ हुनुहुन्छ? – फेरि पहिलो वक्ता शुरू भयो। – निश्चित छ कि हामी जानु पर्छ, तर यसरी हैन। हामीलाई थाहा हुनुपर्छ कि हामी कहाँ जाँदैछौं। अन्यथा हामी आफु बाच्नुको सट्टा अझ खराब अवस्थामा पुग्न सक्छौं। मेरो सुझाव छ कि हामी एक त्यस्तो नेता छनौट गरौ जसको हामी सबैले पालना गर्नु पर्छ र जसले हामीलाई उत्तम र सिधा बाटो देखाउने छ।

– आउनुहोस् छानौं! हामी अहिले नै कसैलाई छनौट गरौ – चारै तिर सुनियो।

अब केवल बहस उत्पन्न भयो, एक वास्तविक अराजकता। सबै जना कुरा गरिरहेका थिए र कोही कसैलाई सुनेको पनि थिएनन र कसैलाई सुन्न पनि सक्षम थिएनन्। तिनीहरू समूहमा विभाजित हुन थाले, प्रत्येक व्यक्ति आफैंमा गनगनाउँदै थिए, र त्यसपछि समूह पनि टुक्रियो। दुई-दुईमा, तिनीहरू एक अर्का हातले कुरा गर्न थाले, कुरा गरिरहे, केहि प्रमाणित गर्न कोसिस गर्दै, एक अर्कालाई बाहुलाले तान्दै, र उनीहरूको हातले मौन गति बनाए। तिनीहरू सबै फेरि भेला भए, कुरा गरिरहे।

– दाजु भाइहरू! – अचानक एक शक्तिशाली आवाज को लागी आवाज आयो जस्ले अन्य सबैको आवाजलाई कर्कश र सुस्त बनायो। – हामी यस प्रकारले कुनै पनि प्रकारको सम्झौतामा पुग्न सक्दैनौं। सबै जना कुरा गर्दैछन र कसैले सुन्दैन। एक नेता छनौट गरौं! हामी मध्ये कसलाई छनौट गर्न सक्छौं? हामी मध्ये कसले सडकहरू जान्नका लागि पर्याप्त यात्रा गरेको छ? हामी सबै एक अर्कालाई राम्ररी चिन्छौं, र म यहाँ एकल व्यक्तिको नेतृत्वमा आफैलाई र मेरो बच्चाहरूलाई राख्दिन। बरु, मलाई भन्नुहोस् कि त्यो यात्रुलाई कसले चिन्छ, जुन आज बिहानदेखि सडकको किनारमा छायामा बसिरहेको छ?

मौनता छायो। सबै आन्जान मानिस तर्फ फर्किए र उसलाई टाउको देखि खुट्टा सम्म हेरे।

त्यो यात्री, मध्यम बुढो, जस्को उदास अनुहार दाह्री र लामो कपालको कारण बिरलै देखिन्थ्यो, उ त्यहाँ बस्यो र पहिले जस्तै चुप रह्यो, विचार मा लीन, र समय समय मा आफ्नो ठुलो लट्ठी जमिन मा हिर्काउथ्यो।

– हिजो मैले त्यो मनिसलाई एउटा केटोको साथ देखेको थिए। तिनीहरू एक अर्काको हात समातेर गल्लीमा गइरहेका थिए। र हिजो राती केटाले गाउँ छोड्यो तर अपरिचित यहीं बसे।

– दाजुभाइ, यो मूर्खतापूर्ण वैयात कुरा भुलौ ताकी हामीले कुनै समय गुमाउन नपरोस। उ जो कोही हो, ऊ टाढाबाट आएको हो किनकि हामी मध्ये कसैले उहाँलाई चिनेका छैनौं र हामीलाई नेतृत्व दिने सबैभन्दा छोटो र उत्तम तरिका उसलाई अवश्य थाहा छ। यो मेरो निर्णय हो कि उ एक धेरै ज्ञानी मानिस हो किनकि उ त्यहाँ चूपचाप बसिरहेका छ र सोचमा छ। अरू कसैले हाम्रो मामिलामा दश चोटि वा सो भन्दा बडि पहिलेनै बोलिसक्थ्यो वा हामी मध्ये एकसँग कुराकानी सुरु गरेको हुन्थ्यो, तर ऊ त्यहाँ पूरै समय एक्लै बसिरहेको थियो र केही बोलेको थिएन।

– पक्कै पनि मानिस चुपचाप बसिरहेको छ किनकि उसले केहि सोचिरहेको छ। ऊ एकदम चतुर छ यो बाहेक अन्यथा हुन सक्दैन – अरुलाई सहमत बनायो र फेरि अपरिचितको जाँच गर्न शुरू गर्यो। प्रत्येकले उनीमा एक उत्कृष्ट गुण पत्ता लगाएका थिए जुन उसको असाधारण बौद्धिकताको प्रमाण थियो।

कुरा गर्न धेरै समय खर्च गरिएन, त्यसैले अन्तमा सबै सहमत भए कि यस यात्रीलाई सोध्नु नै उत्तम हुन्छ – जसलाई उनीहरूले हेरेको थिए, परमेश्वरले उनीहरूलाई यस संसारमा राम्रो ठाउँ र अधिक उर्वर माटोको खोजीमा लैजान पठाउनुभएको थियो। उ तिनीहरूको नेता हुनुपर्दछ, र तिनीहरूले उनको कुरा सुन्नपर्नेछ र कुनै प्रश्न बिना उहाँको आज्ञा पालन गर्नपर्नेछ।

तिनीहरूले आफू माझबाट दश जना मानिसहरूलाई रोजे जो अपरिचित व्यक्तिलाई उनीहरूलाई आफ्नो निर्णय बताउन गएका थिए। यो प्रतिनिधिमण्डलले उनलाई दयनीय अवस्था देखाउँदै उनलाई उनीहरुको नेता हुन भन्यो।

ती दश जना नजिक गए र नम्रतापूर्वक शिर झुकाए। तिनीहरू मध्ये एकले क्षेत्रको अनुत्पादक माटोको, सुख्खा वर्षहरू र उनीहरू सबैले आफुले भोगेको दु: खको बारेमा कुरा गर्न थाले। उनले निम्न तरिकाले समाप्त गरे:

– यी सर्तहरूले हामीलाई हाम्रो घर र हाम्रो भूमि छोड्न र संसारमा राम्रो मातृभूमि खोज्न बाध्य तुल्याउँछन्। यस क्षणमा जब हामी अन्तमा सम्झौतामा पुगेका छौं, यस्तो देखिन्छ कि भगवान्‌ले हामीमाथि कृपा दर्शाउनुभएको छ, कि उहाँ तपाईंलाई पठाउनुभयो – तपाईं एक बुद्धिमान र योग्य अपरिचित – र तपाईंले हामीलाई अगुवाई गर्नुभयो भने र हामीलाई हाम्रो दु: खबाट स्वतन्त्र पार्नुहुनेछ। यहाँका सबै बासिन्दाहरूको नाममा हामी तपाईंलाई हाम्रो नेता हुन आग्रह गर्दछौं। जहाँसुकै जान सक्नुहुन्छ, हामी पछ्याउनेछौं। तपाईंलाई सडकहरू थाहा छ र तपाईं निश्चित रूपमा खुशी र उत्तम जन्मभूमिमा जन्मनुभएको थियो। हामी तपाईंलाई सुन्नेछौं र तपाईंका सबै आदेशहरू पालन गर्नेछौं। के तपाईं, विनाशबाट धेरै प्राणहरू बचाउन सहमत हुनुहुन्छ? के तपाईं हाम्रो नेता बन्नुहुनेछ, बुद्धिमान अपरिचित?

सबै यस उत्तेजित भाषणको समयमा, बुद्धिमान अपरिचितले एक पटक पनि टाउको उठाएनन। सारा समय उहाँ उही स्थितिमा रहे जस्तो उनीहरूले उन्लाई भेट्टाएको थिए। उन्को टाउको तल झरेको, उनी भूँईमा लडिरहेका थिए, र उनले केही पनि भनेनन्। उनले केवल समय-समयमा र आफ्नो लट्ठी भुइ मा हिर्काउथे र – सोच्थे। जब भाषण समाप्त भयो, तब आफ्नो स्थिति नबादलेरै उनले बिस्तारै घुमाउरो परे:

– म हुन्छु!

– त्यसोभए हामी तपाईंसँग जान सक्छौ र राम्रो ठाउँ खोज्न सक्छौं?

– तिमी सक्छौ! – उसले आफ्नो टाउको नउठाएरै जारी राखे।

अब उत्साह र प्रशंसा को अभिव्यक्ति उठेको छ, तर अपरिचितले यसको कुनै एक शब्द भनेनन्।

ती दश जनाले आफ्नो सफलताको बारे सम्मेलनमा जानकारी दिए र थप्दै भने कि उनीसँग महान् बुद्धि छ भनेर अब तिनीहरूले केवल मात्र देखे।

– उनी तेस स्थान देखी अलीकती पनि सरेको थिएनन वा कम्तिमा को बोलेको छ भनेर हेर्न सम्म टाउको उठाएनन। उनी केवल चुपचाप बसे र ध्यान गरे। हाम्रो सबै कुरा कदर गर्न उसले केवल चार शब्दहरू बोले।

– एक वास्तविक ऋषि! दुर्लभ बुद्धिमत्ता! – तिनीहरू खुशीसँग सबै पक्षबाट चिच्याए कि परमेश्वर आफैले उनलाई बचाउन स्वर्गबाट एउटा स्वर्गदूतको रूपमा पठाउनुभयो। सबै एक त्यस्तो नेताको सफल नेतृत्वमा विश्वस्त थिए जसलाई संसारमा कुनै कुराले असन्तुष्टि दिन सकेन। र त्यसैले यो सबै कुरा भोलिपल्ट बिहान गर्ने निर्णय गरियो।

(अर्को पृष्ठ)